पुणे-विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी परीक्षेत पास झालो म्हणून हुरळून न जाता देशाची, समाजाची सेवा करण्यासाठी उच्चपदावर जावे . मात्र त्यासाठी कठोर परिश्रमाची गरज लागते. त्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करा, असे आवाहन हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी हडपसरमधील प्रभाग ४५ काळेपडळ, महंमदवाडी येथे काढले. गुणवंतांचा सत्कार व मोफत गरजू यांना शालेय साहित्याचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यकमाचे आयोजन लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग भानगिरे यांनी केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी महादेव बाबर म्हणाले की, जयसिंग भानगिरे यांचे कार्य अनेक बाबतीत सरस आहे आणि समाजहिताचे आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत केलेले कार्य कौतुकास्पद आहे. प्रतिष्ठानच्या वतीने २५०० गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. १०वी, १२ वी च्या १५० गुणवंतांचा सत्कार यावेळी झाला. या कार्यक्रमाला प्रा. भोंग, प्रभाकर कदम, सुरेश हडदरे, वैशाली काळे, कविता पाटील, योगेश गवळी, अमित गायकवाड, नितीन गावडे, विकास आखाडे, रोहन काळे, विशाल पाचपुते उपस्थित होते.