मुंबई: भारतात आणि जगातील इतर अनेक भागांमध्ये कोविड-१९च्या प्रभावामुळे निर्माण झालेली परिस्थिती अतिशय चिंताजनक असून यावर तातडीने सर्वतोपरी कृती करणे आवश्यक आहे. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष श्री. रतन एन टाटा यांनी सद्यस्थिती हाताळण्यासाठी काही कृतियोजनांची आणि ५०० कोटी रुपये बांधील केल्याची घोषणा केली आहे.
कोविड-१९ विरोधातील लढ्यासाठी आणि इतर पूरक कामांसाठी टाटा सन्स अतिरिक्त १००० कोटी रुपयांची मदत जाहीर करत आहे. टाटा ट्रस्ट्स आणि आमचे मानद अध्यक्ष श्री. टाटा यांच्यासोबत आम्ही काम करू आणि त्यांच्या उपक्रमांना आमचा संपूर्ण पाठिंबा असेल. आमच्या समूहची सर्व नैपुण्ये उपयोगात आणता यावीत यासाठी आम्ही सहकार्याने काम करू.
टाटा ट्रस्ट्सने आखलेल्या उपक्रमांच्या बरोबरीनेच आम्ही आवश्यक व्हेंटिलेटर्स देखील आणत आहोत आणि लवकरच भारतात त्यांचे उत्पादन केले जावे यासाठी तयारी करत आहोत.
सध्या आपला देश एका अभूतपूर्व स्थितीचा आणि संकटाचा सामना करत आहे. आपण ज्यांना सेवा प्रदान करतो त्या समुदायांचे जीवनमान उंचावून त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण सर्वांनी जे जे करणे आवश्यक आहे ते सर्व आपण केले पाहजे.