नागपुरातील श्री.हर्षल तोंडरे,श्रीमती रीटा गवांदे,वर्ध्यातील श्री.अतुल वंजारी आणि अमरावतीमधील श्री.विनय चौधरी यांना देशाच्या माननीय पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याची अभूतपूर्व संधी मिळाली.
आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वोडाफोन आयडिया लिमिटेडने (व्हीआयएल) नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस २०२२ (आयएमसी) मध्ये पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना आपल्या स्मार्टऍग्री उपक्रमाचे प्रात्यक्षिक दाखवले. देशभरातील १० राज्यांमध्ये ५ लाख शेतकऱ्यांसाठी वी स्मार्टऍग्री तंत्रज्ञान सुविधा तैनात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पर्यावरणानुकूल शेती पद्धतींचा वापर करून रोजगारामध्ये सुधारणा करता यावी यासाठी मदत म्हणून वी स्मार्टऍग्रीमध्ये विविध आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे, त्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), सेन्सर्स, क्लाऊड तंत्रज्ञान, एचडी कॅमेरे, ड्रोन आणि इन्सेक्ट ट्रॅप्सचा समावेश आहे.
भारत सरकारच्या कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत माननीय पंतप्रधानांसमोर वोडाफोन आयडिया लिमिटेडचे अध्यक्ष रविंदर ठक्कर आणि चीफ रेग्युलेटरी व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर श्री. पी बालाजी यांनी वी स्मार्टऍग्रीचे प्रात्यक्षिक दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह वी ५जी नेटवर्कवर आयएमसीमधून मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील स्मार्टऍग्री लाभार्थी शेतकऱ्यांसोबत व्हर्च्युअली संवाद साधला. शेतांमध्ये तैनात करण्यात आलेल्या स्मार्टऍग्री तंत्रज्ञानाने रोजगारामध्ये कशा प्रकारे सुधारणा घडवून आणल्या आहेत, तसेच रियल-टाइम अपडेट्स, स्थानिक टेक्स्ट आणि व्हिडिओ सल्ला यामुळे पिकांच्या उत्पादनात, गुणवत्तेत कशी वाढ झाली आहे, पाण्याचा वापर, संचालन खर्च कसा कमी झाला आहे व उत्पन्न वृद्धी कशी घडून आली आहे या सर्वांची माहिती शेतकऱ्यांनी यावेळी दिली.
नागपुरातील श्री. हर्षल तोंडरे, श्रीमती रीटा गवांदे, वर्ध्यातील श्री. अतुल वंजारी आणि अमरावतीमधील श्री. विनय चौधरी यांना देशाच्या माननीय पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याची आणि स्मार्टऍग्री उपक्रमातून त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती देण्याची अभूतपूर्व संधी मिळाली. त्यांच्यासाठी हा प्रसंग संस्मरणीय ठरला.
पंतप्रधानांनी आपला अमूल्य वेळ आणि पाठिंबा या उपक्रमाला दिला यासाठी वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ रेग्युलेटरी व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशनचे संचालक श्री. पी बालाजी यांनी त्यांचे आभार मानले. श्री. पी बालाजी म्हणाले,” पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो की ते वी बूथवर आले आणि मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील आमच्या लाभार्थी शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आपला मौल्यवान वेळ दिला. शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या आणि शेतीच्या नव्या तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या व्हिजनला पाठिंबा देताना वोडाफोन आयडियाला खूप अभिमान वाटत आहे. वी स्मार्टऍग्री प्रकल्प भारतात शेती पद्धतींमध्ये परिवर्तन घडवून आणत आहे, उत्पादनक्षमतेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञान व इंटेलिजंट सुविधांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत आहे. आमच्या या तंत्रज्ञान इंटरव्हेन्शनमुळे भारतातील १० राज्यांमधील ५ लाखांहून जास्त शेतकऱ्यांसाठी शेती पद्धती, शेती उत्पादन, उत्पन्न आणि एकंदरीत जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवून आणण्यात मदत मिळाली आहे. भारतातील कृषी क्षेत्रामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर आणि अधिक सखोल सामाजिक परिवर्तन घडून यावे यासाठी आमच्या तंत्रज्ञान नैपुण्याचा वापर करण्यासाठी आम्ही सतत वचनबद्ध आहोत.”
वी स्मार्टऍग्रीमध्ये शेती वैज्ञानिक व तंत्रज्ञान तज्ञांच्या सहयोगाने शेतकऱ्यांना शेतीमध्ये पर्यावरणानुकूल व इंटेलिजंट शेती पद्धतींचा वापर करता यावा यासाठी भौतिक साहाय्य देखील पुरवले जाते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून वीने १४० टेक-सॅव्ही युवा शेती उद्योजकांना आणि १८ शेतकरी उत्पादक संघांना (एफपीओ) शेतकऱ्यांची साहाय्य पुरण्यासाठी व पिकांविषयीची महत्त्वाची माहिती सहजतेने मिळवण्यात मदत करण्यासाठी एम्पॅनेल केले आहे. वी स्मार्टऍग्री प्रोग्रामने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा व पश्चिम बंगाल या १० राज्यांमधील ५ लाखांपेक्षा जास्त लघु व मार्जिनल शेतकऱ्यांना सक्षम बनवले आहे.