पुणे- सुमारे दहा कोटी रुपयांचा अनाठायी खर्च करून स्वतःच्या मिरवण्यासाठी आणि बसण्या उठण्याच्या सोयीसाठी महाराष्ट्रभर अलिशान कार्यालये घेणाऱ्या चित्रपट महामंडळाने बॅक स्टेज ,आणि सहायक कलाकार , निर्मिती विभागात ,लेखन आणि कला प्रसिद्धी विभागात असलेल्या हजारो गरीब कलावंतांकडे दुर्लक्ष केल्याने आणि त्यांची बाजू शासनापुढे मांडून इतरांसमवेत त्यांनाही आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी काहीही न केल्याने आता संचारबंदीच्या काळात सिनेमा , नाटक , तमाशा सारेच बंद असल्याने अशा गरीब कलावंतांवर उपासमारीची आणि हमाली करण्याची वेळ येत असून अशा कलावंतांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शासनातर्फे आर्थिक पैकेज जाहीर करावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशअध्यक्ष बाबा पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोहोंना पत्र पाठविले आहे. अनेक कलावंत ,निर्माते, दिग्दर्शक श्रीमंत आहेत पण त्याहून कितीतरी पटीने अधिक हजारो कलावंत क्षेत्राशी निगडीत लोक गरीब आहेत त्यांच्या साठी आपण हि मागणी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहेकी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंधरा दिवसांची संचारबंदी कायम केली असून या संचारबंदी अंतर्गत विविध क्षेत्रातील कामे पूर्ण बंद केली आहेत. त्यापैकीच कला क्षेत्रात काम करणार्या कलावंतांना सुद्धा या पंधरा दिवसाच्या संचारबंदी चा मोठा फटका बसणार आहे, गेल्या मार्च पासून कोविडमुळे आधीच लोककलावंत आर्थिक संकटात सापडला आहे. तर चित्रपट निर्मिती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे तर अनेक वर्षापासून लोककलावंत,व नाट्य चित्रपट क्षेत्रावर ज्या लोकांची पोट आहेत अशा लोकांना कामावर गेल्याशिवाय त्यांच्या घरातली चूल पेटणार नाही अशी स्थिती असताना दर वेळी प्रमाणे प्रत्येक वेळेस संचारबंदीत लोककलावंत, चित्रपट व नाट्यकलावंत यांनाच या लॉक डाऊनचा फटका सहन करावा लागतो .कारोना ने मरण नंतर येईल मात्र उपासमारी ने मरण आधी येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,गेल्या वर्षी सुद्धा लॉक डाउन मध्ये ना आर्थिक मदत झाली ना अन्नधान्याची मदत झाली याहीवर्षी याच पद्धतीने मध्ये कुठल्याही प्रकारचे नियोजन लोककलावंत किंवा कलावंतांसाठी केलं गेलं नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या मुळे ब्रेक द चेन ( लॉकडाऊन ) लावला असून, अनेक क्षेत्राला आपण सूट दिली आहे, तसेच आर्थिक अनुदान व रेशन देऊ केले आहे, मात्र गेल्या मार्च 2020 पासून आपण कलाकार , लोककलावंत , तंत्रज्ञ यांना काहीही मदत केली नाही व आर्थिक पॅकेज दिले गेले नाही. लॉक डाऊन च्या सुरुवातीला प्रयोग, शूटिंग, कार्यक्रम बंद केले तर अनलॉक च्या काळात सर्वात शेवटी शूटिंगला खूप सारे बंधने घालत काम करण्याची परवानगी दिली.
आता ही 15 दिवसाचा लॉक डाऊन लावला आहे ज्यात शूटिंग, लोककलावंताच्या कार्यक्रमांना आणि नाटकाच्या प्रयोगाला बंदी घालण्यात आली आहे, तर कलाकारांनी जगायचे कसे…?. देशातील सर्वात मोठ्या इंडस्ट्री चा भाग असणारे, राज्यासह देशाला सर्वात जास्त कर देणाऱ्या इंडस्ट्री चा घटक असणारे हे कलाकार ,मग या सर्व स्थरातील कलाकारांवर सतत अन्याय का ..? काय फक्त कलावंत हा घटक कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत आहे का ..? विविध क्षेत्राला या लॉक डाऊन मधून वगळण्यात आले आहे, कलाकारांना गत वर्षी पण शासनाने ना आर्थिक मदत केली ना धान्याचा पुरवठा केला, या वर्षीही तेच चालू आहे..!
कलाकारांची हालत सध्या खूप खूप वाईट आहे. कारण मागील वर्षी आणि याही वर्षी सर्व जत्रा,यात्रा, उत्सव, लग्नसराई रद्द झाल्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर बरोबर शूटिंग, सिरीयल यावर पण बंदी आल्यामुळे बऱ्याच नवोदित कलाकारांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सारखे 45 हजारांच्यावर सभासद संख्या असणाऱ्या संस्थेने यासंदर्भात अद्याप कुठल्या प्रकारची भूमिका का घेतली नाही असा सवाल यावेळी बाबा पाटील यांनी विचारला आहे, लॉक डाऊन च्या काळात कमी युनिट मध्ये कोविड चे नियम पाळत शुटिंग ला परवानगी द्यावी आणि त्याच बरोबर कलाकारांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी माागणी बाबा पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.