पुणे- खरे तर सुरुवातीच्या पावसात भिजायला कोणाला आवडत नाही, आणि पाउस हा कोणाच्या आवडीचा विषय नाही ?आणि तळजाई चा परिसर म्हटले कि , निसर्गाची जादू च माणसाला मोहवून टाकते. आणि त्यात माणूस रसिक असला कि मग आनंद द्विगुणीत झाल्या शिवाय राहत नाही .अशा वातावरणात दोन बाल गायिकांनी चक्क आज सायंकाळी ..आली सावली सावली , गेले घाबरून ऊन..आता पाउस पडेल ,जाऊ सगळे भिजून .. हे गीत गायला सुरुवात केली ,आणि मग काय … निसर्गानेही त्यांना नाखूष नाही केले… त्यांची साद ऐकताच जणू वरुणराजाची बरसात सुरु झाली .. आणि मग भिजत भिजतच या दोन्ही छोट्या गायिकांनी मोठा आनंद मिळविला . संतोष वाटपाडे यांचे गीत आणि निखील महामुनी यांचे संगीत असलेले हे गीत कुठे कोरडी बावडी ,पुन्हा पाण्याने भरेल,कुणी नांगर धरेल, कुणी पेरणी करेल,आग पोटात लागली ,आता जाईल विझून ,आता कळेल मातीच्या काळजात आहे कोंब ..सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात पावसाच्या रूपाने आशादायी सकारत्मक उर्जा देणारे हे गीत ऋचा महामुनी आणि श्रीया महामुनी या दोन बहिणींनी गायले आहे जरूर पूर्ण ऐका ..आणि पहा ..