मुंबई-अभिनेता सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्या प्रकरणाने एकूणच सिनेसृष्टीतील लॉबी, खच्चीकरण कारस्थानांचा विषय ऐरणीवर आला आहे,मराठी चित्रपट सृष्टीतील पड़द्यामागचे राजकारण असे शीर्षक देऊन मराठी निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीही आपल्या अनुभवातून दिसलेले वास्तव आज सोशल मिडियातून कथन केले आहे, पण अशा लोकांना आपण पुरुन उरलो ,टिकलो आणि चांगली कामगिरी करून दाखविली असे त्यांनी स्पष्ट केले आहे . पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे .. त्यांच्याच शब्दात..