मराठीमध्ये नेहमीच आशयघन चित्रपटांची निर्मिती होते हे आज जगजाहिर आहे. विषयाला अनुसरून आशयमांडण्याचं कसब मराठमोळ्या दिग्दशर्कांच्या अंगी असल्यानेच आज जगभर मराठीचा डंका वाजतोय. याच वाटेने जाणाºया आणखी एका मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच करण्यात आला आहे. शैक्षणिक व्यवस्थेकर भाष्यकरणाºया या चित्रपटाचं नाव ‘कॉपी’ आहे.निर्माते गणेश पाटील आणि शंकर म्हात्रे यांची निर्मिती असलेल्या ‘कॉपी’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्तआॅडिओ गॅरेज स्टुडिओ, जुहू येथे गीतध्वनीमुद्रणाने करण्यात आला. याप्रसंगी गायक प्रविण दोणे यांनी गायलेलं‘चालला चालला जीक पांघरूनिया…’’ हे गीत रेकॉर्ड करण्यात आलं. राहुल साळवे यांनी लिहिलेल्या या गीताला रोहनप्रधान-रोहन गोखले (रोहन-रोहन) या संगीतकार जोडीने संगीत दिलं आहे. या प्रसंगी दिग्दर्शक-अभिनेते विजयपाटकर चित्रपटातील कलाकार अंशुमन विचारे, जगन्नाथ निकंगुणे, विपुल साळुंखे तसंच तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होते.
‘श्री महालक्ष्मी किकएशन्स’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडेकरणार आहेत. ‘कॉपी’ हा चित्रपट समाजातील समाजातील शिक्षण व्यवस्थेकर भाष्य करणारा आहे. या चित्रपटाच्याअनुषंगाने शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा चर्चेला येणार यात शंका नाही.
‘कॉपी’ हा चित्रपट समाजातील विशेषत: ग्रामीण भागात झालेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणाला काचा फोडणारा आहे.
या चित्रपटाच्या विषयाबाबत बोलताना हेमंत धबडे-दयासागार वानखेडे हे दिग्दर्शक द्वयी म्हणाले, ‘एकेकाळीशिक्षकांना देवाप्रमाणे पूजले जायचे, पण आज शिक्षणाच्या बाजारीकरणाचा परिणाम शिक्षणासोबतच शिक्षकावरहीझाला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे शिक्षकांची मानसिकता बदलली आहे. याकारणामुळे शिक्षकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्याकरहोत आहे. शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मानसिकतेचा आढावा ‘कॉपी’ या चित्रपटाच्या निमित्ताने घेण्यातयेणार आहे. आज समाजात जे घडतंय ते दाखकण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला जाणार आहे. या निमित्ताने शिक्षणव्यवस्थेत होणारा काळा बाजारही उजेडात येईल यात शंका नाही. चित्रपट हे समाज व्यवस्थेकर भाष्य करण्याचं उत्तममाध्यम असल्याने ‘कॉपी’मध्ये हा विषय मांडण्यात येणार आहे.
‘कॉपी’ची संकल्पना गणेश रामचंद्र पाटील यांची आहे. हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे यांनी राहुल साळकेयांच्या साथीने या चित्रपटाची कथा लिहिली असून पटकथालेखन हेमंत-दयासागर यांनीच केलं आहे. दयासागर यांनीया चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. कॅमेरामन सँटिनिओ टेझिओ या चित्रपटाचं छायालेखन करणार असून संदिपकुचिकोरके यांनी कलादिग्दशर्नाची जबाबदारी सांभाळली आहे. कोरिओग्राफर रॉकी हारळे या चित्रपटातील गीतांसाठीकोरिओग्राफी करणार आहेत. मिलिंद शिंदे, कमलेश साकंत, अंशुमन किचारे, जगन्नाथ निकंगुणे, विपुल साळुंखे,अनिल नगरकर, कैलास वाघमारे, राहुल बेलापूरकर, आशुतोष काडकर, पूनम वाघमारे, सौरभ सुतार, प्रवीण कापडेआणि रकी किरकर या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. रकिंद्र तुकाराम हारळे या चित्रपटाचे कार्यकारीनिर्माता असून जय घोंगे आणि तपिंदर सिंग प्रॉडक्शन मॅनेजर आहेत.