मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदारांना जागृक करताना मुख्यमंत्री म्हणाले, की “लोकशाहीत लोक सरकारला सवाल करतात, सरकारकडून त्यांना काही अपेक्षा असतात. परंतु, ज्यांनी मतदान केले त्यांनाच सरकारला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार असतो. मी सर्वांनाच मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करतो.” महाराष्ट्र आणि हरियाणात एकाचवेळी मतदान आणि मतमोजणी केली जाणार आहे.