पुणे – मध्यवस्तीतील पेठांमध्ये पाणीपुरवठ्याच्या तक्रारी लोकांनी मांडल्याच शिवाय जुन्या वाड्यांची दुरुस्ती, फेरबांधणी यातही लक्ष घालण्याची मागणी लोकांनी केली. लोकांना न्याय मिळून प्रश्नाची तड लागेपर्यंत पाठपुरावा करेन असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी सांगितले.
कसबा विधानसभा मतदारसंघातील नाना पेठ, गणेश पेठ, बुधवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ परिसरात गुरुवारी पदयात्रा काढून अरविंद शिंदे यांनी लोकांशी संवाद साधला. वाड्यांमधील रहिवासी, जुन्या सोसायट्यांमधील रहिवासी यांनी आवर्जून भेटून आपल्या भागात पुरेश्या दाबाने पाणी येत नाही, अपुरा पाणीपुरवठा होतो अशा तक्रारी मांडल्या. विशेषतः महिला वर्गाने या तक्रारी मांडल्या. जुन्या वाड्यांच्या दुरुस्ती, फेरबांधणीत लक्ष घालावे, सर्वांना न्याय मिळेल अशी कामे व्हावीत अशी मागणी केली. शहराचा पाणीपुरवठा, जुन्या वाड्यांचे प्रश्न याविषयी महापालिकेत मी वारंवार बोललो आहेच, वेळप्रसंगी सत्ताधारी आणि प्रशासनाशी संघर्षही केला आहे असे सांगून शिंदे म्हणाले, लवकरच मालक, भाडेकरू यांच्या बैठका घेऊन या प्रश्नाची तड लागेपर्यंत पाठपुरावा करेन.
मतदारसंघातील कामगार मैदान, पालखी विठ्ठल मंदिर, साखळी पीर तालीम, घसेटी पूल, रामोशी गेट, ढोर गल्ली, डुल्या मारुती, पोटसुळ्या मारुती, हमजेखान चौक, किराड ऑफिस, सोमेश्वर मंदिर, बढाई गल्ली, तांबोळी मशीद, जगोबादादा तालीम, कसबा गणपती, विष्णूपुरा, ढमढेरे बोळ, तपकीर गल्ली, दगडी नागोबा, देवजीबाबा चौक, दूध भट्टी या परिसरातून गुरुवारी पदयात्रा काढण्यात आली.
या पदयात्रेत विरेंद्र किराड, रविंद्र धंगेकर, बंडूअण्णा आंदेकर, वनराज आंदेकर, अजित दरेकर, सुनील शिंदे, दत्ता सागरे, रविंद्र माळवदकर, संतोष आरडे, राजेंद्र भणगे, सोमनाथ कुलकर्णी, गणेश नलावडे, राजू शेख, युसूफ शेख, मश्कुर शेख, मनिष आंदे, विलास जैन, तुषार सणस, बाबा चोक्सी, प्रवीण करपे, अजय दराडे, संदीप आटपाळकर, राजेंद्र आलमखाने, गोरख भिकुले, नितीन इंदलकर, वनिता जगताप, सरिता काळे, रत्ना नाईक आदी सहभागी झाले होते.