फडणवीस सरकार घालविण्याशिवाय महाराष्ट्राला गत्यंतर नाही -रुपाली चाकणकर,अश्विनी कदम (व्हिडीओ)
पुणे- वाढत्या बेरोजगारीने आणि रोजगाराच्या चिंतेने हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता फडणवीस सरकार घालविण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही असे प्रतिपादन येथील पर्वती विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या पदयात्रेत सहभागी झालेल्या प्रदेश महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे तर अश्विनी कदम यांनी ,’मी पर्वती कन्या आहे, बकाल होत चाललेल्या या मतदार संघाच्या विकासाबाबत मी आवाज उठवून कामे करवून घेवू शकते आणि मला विश्वास आहे येथील मतदार या कामासाठीच मला येथून विधानसभेत पाठवतील ‘असे सांगितले.
आज विजया दशमी च्या दिवशी सायंकाळी अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचारार्थ पद्मावती देवी चे दर्शन घेऊन त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेला प्रारंभ झाला .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर , माजी आमदार जगन्नाथ शेवाळे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव साळुंखे , काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड ,माजी नगरसेवक सुनिल बिबवे , प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे , संतोष नागरे , डॉ सुनिता मोरे , गौरी जाधव ,अमोल ननावरे,अनिल सातपुते,सतीश पवार , आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते
यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या प्रचार फेरीत सहभागी झाले होते .या प्रचार फेरीला पावसाचे सावट आणि दसऱ्याची सायंकाळ असून हि मोठा प्रतिसाद मिळाला .पद्मावती मंदिर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – मोगल वसाहत परिसर- नवजीवन सोसायटी परिसर – वीर लहुजी सोसायटी परिसर- सहकार नगर पोलिस स्टेशन- परिसर – गोल मंदिर परिसर- विणकर सोसायटी परिसर-विणकर सभागृह -निर्मल पार्क – पंचवटी सोसायटी – तीन हत्ती चौक – संभाजीनगरया मार्गाने हि प्रचारफेरी काढण्यात आली .