नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा धोका वाढत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 400 च्या जवळपास पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण 89 आहेत. त्यामुळे सर्व स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जवळपास देशभरातील 22 राज्य आणि 80 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदींनी ट्विट करत जनतेला पुन्हा आवाहन केले आहे.
मोदींनी ट्विट केले आहे की,’ केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचे आदेश देऊनही अनेक जण बाहेर फिरताना दिसत आहेत. काही जण कामाविना फिरताना आढळून आले आहेत. लॉकडाऊनला अजूनही गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र जनतेनं हे गांभीर्यानं घ्यायला हवं. सरकारननं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. राज्य सरकारनं आपल्या स्तरावर नियमांचं कठोरपणे पालन करण्याचे आदेशही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत.’