नवी दिल्ली: महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज, मंगळवारी सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला. महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी घ्यावी, असा आदेश कोर्टानं दिला. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचं लाइव्ह प्रक्षेपण करा, असे दिशानिर्देशही कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात भाजपला जोरदार दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रामना, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांनी उद्याच बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, फडणवीस सरकारला 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच, यात कोणतेही गुप्त मतदान होणार नाही, सर्व निकालाचे लाईव्ह टेलिकास्ट केले जाईल, असेही न्यायालयाने सांगितले.उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणी भाजपला घ्यावी लागणार आहे. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात यावी असे आदेशही सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत. तसेच, विधानसभा अध्यक्षांची निवडही लाईव्ह करण्यात यावी. हंगामी अध्यक्षांच्या अंतर्गत बहुमत चाचणी घ्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. यामुळे आता बुधवारी सायंकाळी पाच वाजेपुर्वी सर्व आमदारांचे शपथविधी पूर्ण करुन भाजपला बहुमताची चाचणी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहे.कोर्टाने सोमवारी दिड तास झालेल्या सुनावनीत सर्व पक्षांची बाजू ऐकली आणि निकाल राखीव ठेवला. विरोधकांनी 24 तासात फ्लोअर टेस्ट करण्याची मागणी केली होती. केंद्राचे म्हणने आहे की, फ्लोअर टेस्ट सर्वात चांगला पर्याय आहे, पण 24 तासातच व्हावा असं काही नाही. यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बाजू मांडणारे वकील म्हणाले की, जर दोन्ही पक्षांना फ्लोअर टेस्ट हवी असेल, तर यात वाईट काय आहे आणि उशीर का होतोय? राष्ट्रवादी-काँग्रेसने सुनावनीदरम्यान, 162 आमदारांचे समर्थनपत्र सादर करण्याची मागणी केली, पण कोर्टाने याची परवानगी दिली नाही. जस्टिस एनवी रमना, जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस संजीव खन्ना यांच्यासमोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (केंद्र), कपिल सिब्बल (शिवसेना), अभिषेक मनु सिंघवी (राष्ट्रवादी-काँग्रेस), मुकुल रोहतगी (देवेंद्र फडणवीस), मनिंदर सिंह (अजित पवार) यांनी आपापल्या बाजू मांडल्या. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षा आपल्या भूमिका स्पष्ट करतील.
न्यायालयाचे आदेश!
महाराष्ट्रात उद्या, बुधवारीच संध्याकाळी बहुमत परीक्षण घ्यावं.
हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवड करा.
आमदारांच्या शपथविधीनंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी.
गुप्त मतदान नको. बहुमत चाचणी प्रक्रियेचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं आणि हंगामी अध्यक्षच बहुमत चाचणी घेतील.
लोकशाही मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे. आतापर्यंत आमदारांचा शपथविधी झाला नाही. लोकांना चांगले सरकार मिळाले पाहिजे.