पुणे- देशावर खूप मोठे ओझे झालेल्या बांगलादेशी घुसखोरांना वाचविण्याचा प्रयत्न म्हणून ‘नागरिकता संशोधन कायद्या’ला (सीएए) काही जण विरोध करीत आहेत. या घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी मोदी आणि शाह कटिबद्ध असून, नागरिकांनी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि पद्मावती प्रतिष्ठान यांच्या वतीने पद्मावती बनहट्टी यांच्या स्मृतिनिमित्त देवधर यांचे ‘नागरिकता संशोधन कायदा’ या विषयावरील व्या‘यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. सोसायटीच्या परिषद आणि नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले, नियामक मंडळाचे सदस्य आदेश गोखले, बनहट्टी प्रतिष्ठानच्या कौमुदी बनहट्टी यावेळी उपस्थित होत्या.
देवधर म्हणाले, ‘हिंदू बहुसं‘य असलेल्या आपल्या देशात अल्पसं‘यांकांवर कधीच अन्याय झाले नाहीत. दुसर्या धर्माचा दुश्वास करायला आम्हाला शिकवले नाही. मुस्लिमांनी या देशाच्या श्रध्दास्थानांवर आक‘मण करुन त्यांचे मॉडेल प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही, उलट सहजीवनाद्वारे इस्लामला आत्मसात करण्याचे काम हिंदूंनी केल्याचे इतिहास सांगतो. तरीही हिंदूंना जातीयवादी ठरविले जाते. हिंदूंना धर्मनिरपेक्षता शिकविण्याची गरज नाही.’
खिलाङ्गत चळवळीपासून भारतातल्या मुस्लिमांना कॉंग‘ेस पाठिंबा देत आली आहे. हे आंदोलन अयशस्वी झाल्यानंतर खांद्याला खांदा लावून साथ देणार्या हिंदूंशी मुस्लिमांनी दंगे केले. १९४६ मध्ये देशातील निवडणुकीत कॉंग‘ेसने अखंड भारताचा नारा दिला होता. मुस्लिम लीग पाकिस्तानच्या बाजूने होते. सत्ता प्राप्तीसाठी कॉंग‘ेसने मुस्लिम लीगसमोर माथे टेकले. त्यामुळे धर्माच्या आधारावर ङ्गाळणी झाली. तुमच्या देशातील अल्पसं‘यांना तुम्ही संरक्षण द्या आमच्या देशात आम्ही देऊ असे ठरले होते. प्रत्यक्षात पाकिस्तानात अल्पसं‘यांक ठरलेल्या हिंदूंवर अन्याय केले गेले. हिंदूंना भारतात आणण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. महात्मा गांधी, पंडित नेहरु आणि सरदार पटेल यांची नागरिकता संशोधन कायदा लागू व्हावा अशी इच्छा होती. सन २००२ मध्ये राज्यसभेत भाषण करताना खासदार डॉ. मनमोहनसिंग यांनी सीएएच्या बाजूने भाषण केले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सीएएचे समर्थन केले होते. मग आताच सीएएला विरोध का केला जात आहे असा प्रश्न देवधर यांनी उपस्थित केला.
बीएमसीसीचे उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. डॉ. यशोधन महाजन यांनी परिचय करुन दिला. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी आभार प्रदर्शन केले