पुणे-अहिल्यादेवी शाळेने राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत विद्यार्थिनींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे हे माझ्या पाहण्यातील पहिलं उदाहरण आहे. म्हणून ते दुर्मिळ आहे. विदेशात प्राथमिक, पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुरुवातच मुळात चित्रकला, हस्तकला यांसार‘या कलांमधून होते. त्यामुळे विद्यार्थी अनुभवातून शिकतात. आल्याकडे हा पायाच दुर्लक्षित केला जातो. चित्रकला हा छंद नसून ती एक मानसिक, शारीरिक जडणघडणच आहे. जगातली सगळी मुलं जन्मजातच चित्रकार असतात. त्यांच्या त्या कलेला खरंतर खतपाणी घालण्याऐवजी आपण ती संपुष्ठात आणत असतो. मुलं चित्र काढतात ही एक नैसर्गिक प्रकि‘या आहे. मुलांच्या चित्रांमधून मलांची मानसिकताही आपल्याला समजते. मुलांचे मानसिक प्रश्न सुद्धा आपण या चित्रकलेमार्ङ्गत सोडवू शकतो. आपण नेहमी मुलांच्या बुद्धिमत्तेचा विचार करतो पण IQ बरोबरच EQ आणि SQ सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. असे विचार अहिलयादेवी शाळेच्या सहस्रचंद्रदर्शन चित्रसोहळ्यानिमित्त प्रसिद्ध चित्रकार प्रा. सुधाकर चव्हाण यांनी काढले. विद्यार्थिनींना काढलेल्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रसिद्ध शिल्पकार श्री. विवेक खटावकर विद्यार्थिनींशी संवाद साधताना म्हणाले, आज एक आगळा-वेगळा योग आहे. माझ्या गरुजींसमोर मला बोलण्याची संधी मिळतेय. त्यांच्या ऋणातून मला थोडंतरी उतराई होता येईल. गुरु किंवा शिक्षक आपल्याला पडवत असतात. मलाही माझ्या गुरुंनी पडवलयं. शिल्पकला येण्यापूर्वी पहिल्यांदा चित्रकला आली पाहिजे. दगडाला जो आकार देतो तो शिल्पकार.
कुठलाही कलाकार हा आपल्या कलेमध्ये परिपूर्ण होत नाही. त्या कलेतील परिपूर्तीचा ध्यासच त्याच्याकडून उत्तमोत्तम कलाकृती घडवून घेत असतो. त्या उत्तमोत्तमाच्या ध्यासाची अस्वस्थता त्याच्याकडून नविनिर्मिती करुन घेते.
कार्यक‘माचे सूत्रसंचालन आणि दीपस्तुती आपल्या सुरेल आवाजता सौ. मानसी देशपांडे यांनी सादर केली. प्रास्ताविक उपमु‘याध्यापिका सौ. दर्शना कोरके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ. सुलोचना माने यांनी करून दिला.
यावेळी त्यासपीठावर मु‘याध्यापिका सौ. स्नेहल कुलकर्णी, आर्टिस्ट कट्टाच्या श्रीम. पटवर्धन, कलाविभाग प्रमुख श्रीम. विद्या जितुरी आणि मोहन देशमुख, कार्याध्यक्षा श्रीम. ज्यात्स्ना कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.