पुणे- मातृभूमीची सेवा करीत सावरकरांनी हजारो देशभक्त निर्माण केले. परंतु देशप्रेम, स्वातंत्र्यसंग‘ाम आणि स्वातंत्र्यवीर यांच्याबद्दल कॉंग‘ेसला कोणतेही प्रेम राहिलेले नाही. देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कॉंग‘ेस करीत आहे. शिवसेना सत्तेसाठी स्वातंत्र्यवीराचा अपमान सहन करीत आहे, ही शोकांतिका आहे. समाज हे पाहात असून योग्य वेळी त्यांना धडा शिकवेल अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख प्रसिद्ध केल्याबद्दल सेवादल कॉंग‘ेसचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने सारसबागेजवळील सावरकर स्मारकासमोर निदर्शने करण्यात आली.
शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट सावयांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या आंदोलनात महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक, प्रदेश चिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, शहर सरचिटणीस गणेश बिडकर, दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर, गणेश घोष यांचा प्रमुख सहभाग होता.
आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘सावरकांचा अवमान करणे हे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. जातीजाती समाज विभागण्याचे काम कॉंग‘ेसने आजवर केले आहे. आता समाजपुरुषांना विभागण्याचे काम सुरू आहे. ते कदापि यशस्वी होणार नाही.’
महापौर मोहोळ म्हणाले, ‘अतिशय हीन पातळीवर जाऊन कॉंग‘ेस सावरकरांचा अवमान करण्याचा प्रयत्न करीत आहे तो निषेधार्ह आहे. या विरोधात देशभरात सर्वसामान्य नागरिक रस्यावर उतरत आहे. अजूनही वेळ गेलेले नाही राहुल गांधींनी देशाची माफी मागावी. सारकरांना सन्मान मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.’