पुणे : ”समाजामध्ये महापुरूषांची पळवापळवी सुरू आहे़ त्यामुळे महापुरुषांच्या कार्याचे महत्त्व मर्यादित रहात आहे़ असे वातावरण विषारी असून येणाºया काळात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील़ देशात माणसांना विभाजित ठेवण्याचे काम नियोजितपणे सुरू असून याबाबत सर्वसामान्यांना जागे करण्याची आवश्यकता आहे,” असे मत ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले़.
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी पेठेतील एस.एम.जोशी सभागृहात सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ़. प्र.चिं. शेजवलकर, ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार, सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, वीरेंद्र किराड, इंटकचे कैलास कदम, सचिन तावरे, संजय बालगुडे, शिवा मंंत्री आदी यावेळी उपस्थित होते़.
नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, ”कोणत्याही विचार आणि पक्षाशी एकनिष्ठ असणे महत्त्वाचे असते़ अन्यथा त्या विचारांना काहीही अर्थ उरत नाही़ जागतिकीकरणानंतरच्या काळात स्वत:ला विकून घेण्यासाठी अनेकजण तयार झाले आहेत़ माध्यमांमध्येही कोणता विचार राहिलेला नाही़ फक्त निवडणूक म्हणजे लोकशाही नाही़ आपल्या भावना, सर्वसामान्यांना विचार मांडण्याची मोकळीक असली पाहिजे़ सर्वसामान्यांना धाडसाने बोलता आले पाहिजे, तर लोकशाही यशस्वी होते़ पण, आताच्या काळात जनता बोलायला घाबरते, ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक आहे़ सध्या पत्रकार, व्यापारी यांच्यापासून सर्वसामान्यांपर्यंत कोणालाही सरकारवर टीका करता येत नाही किंवा मत मांडता येत नाही़ अशाप्रकारे, सध्या देशात परिस्थिती हुकूमशाहीकडे जात असून, ख्रिश्चन, मुस्लिम, कम्युनिस्ट यांना शत्रू ठरविले जाते़ ”
डॉ़. प्र.चिं. शेजवलकर म्हणाले, ”अर्थशास्त्र हे गतिमान असते़ त्यामुळे त्याबाबत अनेकांचे एकमत लवकर होत नाही़ सध्या देशात उद्योगांमध्ये तीव्र मंदी आहे़ मात्र सरकारला याबाबत सल्ला देणारे खरी परिस्थिती सांगत नाहीत़ कमी झालेली रेल्वेची मालवाहतूक, वीजेचा कमी झालेला वापर, घटलेले औद्योगिक उत्पादन, डिझेलची कमी झालेली मागणी या लक्षणांवरून मंदीचे भाकित करता येते़ गेल्या तेरा महिन्यांपासून निर्यात शून्यापर्यंत घसरली आहे़ रोजगार वाढविणे हाच मंदीवरचा सर्वोत्तम उपाय आहे़ जनतेच्या हातात पैसा आला पाहिजे़ त्यावर राजकीय उपाययोजनाही करता येतात, मात्र त्याकडे सरकारचे लक्ष नाही़”
उल्हास पवार म्हणाले, ”केंद्र सरकारच्या धोरणांमुळे लोकशाहीचा आशय नष्ट होत चालला आहे़ सेवा, कर्तव्य, त्याग या गोष्टींचे महत्त्व कमी झाले आहे़ समजून-उमजून राजकीय धबडग्यात घोडेबाजाराची भाषा वापरली जाते़ महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यापूर्वी काँग्रेसन आठरा दिवस विचार केला़ मात्र, राजकीय आपद्धर्म म्हणून सत्तेत सहभाग घेतला़ आपद्धर्माचे नंतर सद्धर्मात रुपांतर करता येते़ त्यामुळे काही गोष्टींना काँग्रेसने मुरड घातली़ महाराष्ट्रातील हे सरकार टिकेल आणि सुरळीत चालेल तसेच राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सुटतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़.
मोहन जोशी म्हणाले, ”लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला नाकारले़ मात्र दोन महिन्यात जनतेच्या ही चूक लक्षात आली़ त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे भाजपविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येउन सत्ता स्थापन केली़ येत्या दोन वर्षात पुणे शहरात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यात येईल़” डॉ. विकास आबनावे यांनी सूत्रसंचालन केले़ कैलास कदम यांनी आभार मानले़