मुंबई चे अनुकरण अन्य शहरांनी करावे,अमृता फडणवीस
पुणे:- नाईट लाईफ विषयी अजून काही विचार केलेला नाही.यात सुरक्षा काशी घेतली जाईल तसेच महिला दिवस-रात्र इथे काम करतात.महिलांसाठी मुंबई सुरक्षित आहे त्या मुळे मुंबईचा मला गर्व वाटतो.मुंबई मध्ये दिवसरात्र काम करणाऱ्या महिला आहेत त्या मुळे मुंबई चे अनुकरण दुसऱ्या शहरांनी देखील करावे,असे मत व्यक्त करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नाईट लाईफ ला पाठिंबा दर्शवला.
नगरसेवक सम्राट थोरात आयोजित मकरसंक्रांत निमित्त हळदकुंकू व न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमपूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.या वेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार भीमराव तापकीर स्थानिक नगरसेविका आरती कोंढरे उपस्थीत होते.
मनसे च्या झेंड्या बद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की राज ठाकरे यांनी पक्षासाठी नवीन दिशा पहिली आहे याचे कौतुक वाटते ते खूप चांगले काम करतील .माझ्यासारख्या शिवसैनिकला खरा नेता पाहण्याची इच्छा असते आणि त्यांना फॉलो करण्याची खऱ्या नेत्याची खूप गरज आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच नाव न घेता टोला लगावला.
राष्ट्रवादी चे नेते शरद पवार यांची सुरक्षा काढून घेतली आहे.याबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की याबाबत मला माहिती नाही.सत्यता पडताळावी लागेल. शरद पवार यांची सुरक्षा काढून घेतल्याबद्दल अफवा पसरवली जात असावी.या मध्ये काही तथ्य नसेल असे वाटते. मात्र या वर मी काही बोलणार नाही.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या काळात विरोधी पक्षाच्या नेत्याचे फोन टॅब केले असा आरोप केला जात आहे.यावर त्या म्हणाल्या,भाजप वर खोटे आरोप केले जात आहेत आणि आधीच्या सरकारमध्ये शिवसेना देखील होती.त्या मुळे त्यांची सुद्धा चौकशी झाली तरी चालेल.