जनतेच्या मागणीमुळे दूरदर्शनवर शनिवार २८ मार्च २०२० पासून रामायण सीरियलचे प्रसारण होईल. पहिला एपिसोड उद्या सकाळी ९ वाजता आणि दुसरा उद्याच रात्री ९ वाजता दाखवला जाईल. दूरदर्शनवर पहिल्यांदा रामायणाचे प्रसारण २५ जानेवारी १९८७ मध्ये सुरु झाले होते आणि शेवटचा एपिसोड ३१ जुलै १९८८ ला पाहायला मिळाले होते.
एक काळ होता, जेव्हा रामायण आणि महाभारत टीव्हीवर टेलीकास्ट झाल्यावर शहर ओसाड पडलेली दिसायची. आजही करोना मुळे शहर लॉकडाउन झाली आहेत, पण त्याला कारण वेगळं आहे. पण, यातच आता दूरदर्शनने घरात कैद झालेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी रामायण आणि महाभारत परत एकदा टेलीकास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
रामानंद सागर यांचा ‘रामायण’ नव्वदीच्या काळातील लोकांचा आवडता शो होता. टीव्हीवर या शोची वेळ लोक आपापल्या घरात कार्यक्रम पाहायला जायचे आणि त्यामुळे शहरे ओसाड पडायची. लोक आपली चप्पल काढून शो पाहायचे, काही लोक टीव्हीची पुजा करायचे. या कार्यक्रमांची टीव्ही इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंद आहे, आणि या दोन्ही कार्यक्रमांना कधीही लोक विसरू शकणार नाहीत.