पुणे-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कष्टकरी आणि हातावर पोट असणाऱ्या कुटुंबियांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळेच अशा कुटूंबियांना दोन वेळच्या जेवणाची सोय आपल्या दीवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येत आहे. केळेवाडीसह इतर भागातही अनेक कुटूंबियांना ही सेवा पुरवली जात आहे.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांच्या प्रमुख देखरेखी खाली कोथरूडमध्ये शेकडो नागरिकांना अन्नदान करण्यात आले. त
कोरोना संकट आपल्या भारतातही पोहचले आहे. या रोगामुळे कष्टकऱ्यांचे एक वेळचे पोट भरणे सुद्धा अवघड आहे. प्रभाग क्र ११ मधील प्रामुख्याने केळेवाडी, हनुमाननगर, राउतवाडी, किष्किंधानंदानगर, जयभवानीनगर, मातोबानगर, सुतारदारा या ठिकाणी बरेच गोरगरीब लोक पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करत होते. पण, सध्याच्या परिस्थितीने पोटाची खळगी भरण्याच्या चिंतेने भयभीत व व्याकूळ झाले आहेत.