पुणे- संपूर्ण भाजपचे किंवा अन्य पक्षाचे नाव खराब होईल असे कृत्य खरेतर कोणी त्या त्या पक्षातील मान्यवरांनी करू नये ,केले तर त्यास पाठीशी घालू नये ,प्रभात रोड वरून कमला नेहरू पार्क कडे जाताना ..हा विषय लोकात रंगलेला दिसत होता , अर्थात लॉक डाऊन असल्याने सारे फोनो फोनीच किंवा सोशल मिडिया वरून चालले आहे असे समजले .नेमके काय प्रकरण आहे ते पाहावे म्हणून काहींना फोन केले ..बहुधा ते फोन वर बोल बोलून वैतागले असावेत .. त्यांनी घेतले नाही म्हणून म्हटले..आणि शेवटी ज्या जागृत महिलेने या विषयाला वाचा फोडली त्या महिलेला संपर्क करायचा प्रयत्न केला पण झाला नाही असो पण विषय मात्र गमतीदार होता .. हे इथे खाली टाकलेले दोन्ही फोटो पहा
हे फोटो जर नीट पाहिले किंवा दिसले असतील तर सारा प्रकार तुमच्या लक्षात आला असेल . पण हे सारे झाले जागृतता, आणि बेधडक ,निडर पणे घेतलेल्या निर्णयामुळे.
कमला नेहरू पार्क पुणेकरांना ठाऊक नसेल असां पुणेकर क्वचित असतील . पण प्रत्येक नगरसेविकेचे नाव केवळ काही वार्डातच लोक सांगतील साऱ्या पुणेकरांना सर्वच नगरसेवक यांची नावे ठाऊक असतील असे काही नाही .
तर विषय असा आहे आज काल कमानी उभारायच्या आणि संकल्पना नगरसेवक आमुक तमुक असे नाव द्यायचे …एवढेच काय कुठे तरी स्वच्छ पुणे सुंदर पुणे असे भिंतीवरी जरी रंगविले तरी संकल्पना नगरसेवक आमुक तमुक अशी स्पर्धाच जणू काही राजकीय मंडळी मध्ये लागलेली असते, तर पुणे तिथे काय उणे म्हणायचे म्हणा …पण चक्क भाजपच्या या नगरसेविकेने कमला नेहरू पार्क च्या फलकाला .. कमला नेहरू पार्क या नावाखालीच संकल्पना आमुक अमुक नगरसेविका असा फलक रंगविला .. अर्थात हा परिसर कुठला.. आपण कुठे करतो काय याचे जरा भान राखायला नको ? पण झाले भान च हरपले. आणि मग कोणी तरी खवळले ..हे काय ५० वर्षांपूर्वीची बाग हि ..या नगरसेविका.. ताई कशा होतील या बागेच्या संकल्पना राबविणाऱ्या …? असा बेधडक प्रश्न उपस्थित केला एका जागृत नागरिकाने
जागृत नागरिक ती हि महिला ..सोशल मिडिया वर त्यांनी केला राग व्यक्त … आणि धडाधड त्यावर प्रतिक्रिया हि उमटू लागल्या …आणि त्या सर्वाना साथ मिळाली ती असीम सरोदे यांची … आता असीम काय गप्प बसणार? ..त्यांनी तक्रार केली महापालिका आयुक्तांकडे .. आणि आयुक्त तर काय चूक दिसली, नजरेस आली ,कि धाडकन दुरुस्ती करणार … त्यानुसार अगोदर त्या नगरसेविकेचे नाव निघाले …आणि आता नंतर ते कोणी चूक केली याचा शोध घेणार .. अर्थात नगरसेविकेच्या पतीने म्हणे .. हि ठेकेदाराची चूक आहे असे सांगितलेय ., आता खरे खोटे सारे जाणून आहेतच ..सारवा सारव होईल .. दुध का दुध ,पाणी का पाणी होईल… पण जागृत नागरिक आणि तत्पर अधिकारी यांनी ठरविले तर बरेच काही होऊ शकते हे सांगणारी हि एक तशी किरकोळ वाटणारी पण महत्वपूर्ण घटना नक्कीच सर्वांनी बोध घ्यावा अशी घडून गेली आहे … तिची दखल माध्यमांनी घेतली नाही तर नवलच …