मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधत ‘लॉकडाऊन ४’ चे संकेत दिले. तसेच मध्यमवर्गियांसाठी पॅकेज जाहीर केले. या संपूर्ण भाषणात गरजेच्या असलेल्या ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप करत पंतप्रधानांच्या भाषणावर विरोधकांनी टीकेची झोड उडवली आहे. पंतप्रधानांना ठोस सांगायच नसेल तर देशाला गोंधळात का टाकायचे? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.पंतप्रधानांना स्वत:हून कोणती वाईट किंवा कठोर बातमी देशासमोर द्यायची नाहीय. केंद्रीय अर्थमंत्री किंवा राज्यांतील मुख्यमंत्र्यांकरवी तशा बातम्या वदवून घेतल्या जातील.कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.मग जर काही ठोस सांगायचेच नसेल तर लाईव्ह येऊन देशवासियांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण का करायचे ? असा प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केलाय.