पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुमारे 70 जणांवर मंगळवारी ‘इडी’तर्फे गुन्हा दाखल केल्यानंतर आज पुण्यात राष्ट्रवादीने जोरदार निषेध नोंदवीत आक्रमक आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली.पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील , नेते अंकुश काकडे,रवींद्र माळवदकर ,माजी आमदार कमल ढोले पाटील ,डॉ. सुनिता मोरे ,सुभाष जगताप ,विशाल तांबे ,प्रदीप देशमुख,अनिस सुंडके,नितीन कदम ,शिल्पा भोसले,जयदेव गायकवाड,बापू पठारे, राकेश कामठे,महेश हांडे,बापू डाकले,स्वाती पोकळे,अश्विनी परेरा, विशाल मोरे,अजीम गुडाकुवाला,संतोष नांगरे,आप्पा रेणुसे,बाळासाहेब बोडके,हसीना इनामदार,वनराज आंदेकर, गणेश नलावडे ,काका चव्हाण,राजेंद्र खांदवे, स्वप्नील दुधाने,फहीम शेख, रईस सूंडके,हाजी फिरोज, मनाली भिलारे,वासंती काकडे,रोहिणी चिमटे,पुनम पाटील, शांतीलाल मिसाळआदी असंख्य कार्यकर्त्यांनी मंडई तील टिळक पुतळ्यासमोर आंदोलन केले .
नंतर यास आक्रमक स्वरूप येवून रस्त्यावर आणि तेथून मंडई पोलीस चौकीत देखील आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला .यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले की, उदयनराजे यांना पक्षात घेतल्यावर भाजपला आकाश ठेंगणे झाले होते. मात्र, पवार यांच्या सभेला साताऱ्यात मिळणारा प्रतिसाद बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपच्या या कृतीचे उत्तर जनता 21 ऑक्टोबरला मतदानातून देईल, असेही ते म्हणाले. शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले ,शरद पवार साहेब हे राज्य सहकारी बँकेत कधीही संचालक नव्हते तसेच ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही सहकारी बँकेमध्ये संचालक अगर त्या संस्थेच्या प्रशासनामध्ये किंवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील असल्याचा काहीही संबंध नव्हता तरी सुध्दा ED ची चौकशी ???
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, आपला हा पुरोगामी महाराष्ट्र चूकीच्या हातात जावू नये, आपले भविष्य सुखरूप रहावे विशेषत: युवा पिढीच्या भविष्यासाठी साहेब हा सर्व आटापिटा करत आहेत आणि त्यांना सगळीकडे मिळणारा प्रतिसाद बघून अश्या पध्दतीने सरकार कारस्थान करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे,
साहेब महाराष्ट्र भर फिरत आहेत व त्याला लोकही खूप प्रतिसाद देत आहेत म्हणून या सरकारला पराभव दिसायला लागला आहे, असे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी सांगितले, हे सरकार ‘हिटलरशाही’ च्या मार्गावर चालत आहे. इडी नाही हा तर भाजपचा घरगडी आहे .विरोधकांना अशा पद्धतीने वागवले जात आहे त्यामुळे देशात आज आणीबाणी असल्यासारखी परिस्थिती आहे. तसेच, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कामठे म्हणाले की, ‘ युवकांचा पवार यांना प्रतिसाद भाजपला अनपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी राजकीय सुडापोटी गुन्हा दाखल केला.मात्र यामुळे त्यांना युवकांचा अधिक प्रतिसाद मिळेल असे वाटते’.