मुंबई :रविवारी संध्याकाळी 5 वाजता सर्वांना आपल्या घरतील गॅलरीमध्ये येऊन अत्यावश्यक सेवीतल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे आवाहन सर्व नागिरकांना केले होते. मात्र अनेक ठिकाणी लोक गर्दी करत रस्त्यावर उतरलेलं चित्र पहायला मिळालं. उपमुख्यमंत्री पवार यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधी व जनतेने रस्त्यावर उतरून, एकत्र येऊन घंटानाद करणं अपेक्षित नाही असं अजित पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, ‘लोकप्रतिनिधींनी आणि प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रोत्साहन, प्रसिद्धी देणं टाळण्याची गरज आहे असं मत पवार यांनी व्यक्त केलं. करोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहोचवत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी करणं टाळावं असं आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी देशात जनता कर्फ्यूचे आवाहन सर्व नागरिकांना केले होते. त्यानुसार देशभरात आज सकाळी 7 वाजल्यापासून जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद मिळाला. या कर्फ्यू दरम्यान मोदींनी आज संध्याकाळी 5 वाजता सर्वांना आपल्या घरतील गॅलरीमध्ये येऊन अत्यावश्यक सेवीतल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे आवाहन सर्व नागिरकांना केले होते.
तसेच या कर्फ्यू दरम्यान मोदींनी रविवारी संध्याकाळी 5 वाजता सर्वांना आपल्या घरतील गॅलरीमध्ये येऊन अत्यावश्यक सेवीतल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे आवाहन सर्व नागिरकांना केले होते.