परिवहन मंत्री सुभाष देसाई यांना दिले निवेदन
नागपूर. ( विशेष प्रतिनिधी ) – देशा सह राज्यातील दळणवळण सांभाळणाऱ्या वाहन चालकांना न्याय मिळावा म्हणून जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशन मध्ये विधानभवनावर मोर्चा घेत संस्थापकीय अध्यक्ष संजय हाळनोर यांनी मागणी केली आहे. यावेळी हाळनोर म्हणाले की, जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने मागील 03 वर्षी पासून विविध राजकीय नेत्यांना वाहन चालकांच्या विविध मागण्या, समस्या बाबतची निवेदने देऊन काहीच उपयोग झाला नाही. दि. 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान औरंगाबाद शहरात जिल्हाधिकारी कार्यालय समोर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांच्या नेत्रुत्वात संस्थेने आमरण उपोषण केले होते. त्यावेळी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी निवेदन स्वीकारून चालक बांधवांच्या सर्व समस्यांचे निवारण करू असे तोंडी विश्वास दिला होता. परंतु, पुढे काहीच हालचाल सरकार कडून झाली नाही. म्हणून 19 डिसेंबर 2019 रोजी संस्था अध्यक्ष संजय हाळनोर यांचे नेत्रुत्वात नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर धडक मोर्चा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे व परिवरहन मंत्री सुभाष देसाई यांना संस्थेच्या शिष्ट मंडळाने भेटुन निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळात संस्थेच्या अध्यक्ष समवेत संस्थेचे उपाध्यक्ष संतोष काळवणे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण वाघ पाचोरा, राज्य उपाध्यक्ष विनोद चांदेकर चंद्रपुर, मराठवाडा अध्यक्ष एकनाथ बिरादार, नांदेड तसेच खांदेश विभाग अध्यक्ष संदिप माळी उपस्थित होते.