मुंबई(प्रतिनिधी)-
एकता कल्चरल अकादमीचा ३१व्या महोत्सवाचा सांगता समारोह,पुरस्कार प्रदान कार्यक्रम नुकताच मुंबईत झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना, प्रेरक वक्ते, लेखक देवेंद्र भुजबळ म्हणाले कि, मुंबईसारख्या महानगरात वर्षानुवर्षे एकत्र राहणाऱ्याची, शेजाऱ्याची सुद्धा आपली ओळख नसते. त्यात पुन्हा तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर दुष्परिणाम होत असून, माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. त्यामुळे ‘एकता कल्चरल अकादमी’ सारख्या संस्थांची पूर्वी पेक्षा आज नितांत गरज आहे. यावेळी भुजबळ यांनी केवळ भाषण न करता मानवी संबंध जोपासण्याची,आनंदाने जगण्याची प्रात्यक्षिके उपस्थितांकडून करवून घेतली. यामुळे क्षणात वातावरण जीवंत झालं. यावेळी माजी खासदार भरतकुमार राऊत यांनी स्वानुभव सांगून सांस्कृतिक अस्मितेचे महत्व विषद केले. नाटककार प्रेमानंद गजवी यांनीही मौलिक मार्गदर्शन केले.
प्रेमाकिरण यांना ”एकता कला गौरव पुरस्कार”, संपदा जोगळेकर कुळकर्णी-अभिनय, सुनीता डागा-अनुवादित साहित्यिक, विलास गावडे, शुभांगी सावंत-दृष्यसंकलन, दुर्गेश सोनार -पत्रकारिता, हरेश साठे, सतीश पाटील- संगीत, डॉ.उषा राव- शैक्षणिक, ऍड.अर्चना गायकवाड-न्याय/विधी, सुनयना गोसावी-कला, डॉ.माधुरी वाघचौरे -शिक्षण, शारीरिक, क्रीडा, संकेत खर्डीकर- तरुण प्रेरक वक्ता, समाजसेवेचे सर्वश्री पुरस्कार अनंत जाधव, किरण बढे, संतोष धोत्रे, डॉ.गिरीश लटके, अशोक कांबळे अशा विविध व्यक्तींना एकता पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रेमाकिरण यांच्या मनोगताने उपस्थित भारावून गेले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकताचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी तर सूत्रसंचालन प्रा.अवधूत भिसे यांनी केले. अभिनेते प्रमोद पवार, नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, आशिष घोडके यांना देखील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. एकताच्या अभिनय, गायन, काव्यवाचन, काव्यलेखन, नृत्य स्पर्धांमधील विजेत्यांनाही रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांनी केले. अशोक कांबळे, संस्थेचे उपाध्यक्ष उज्जय आंबेकर, समन्वयक गंगाधर म्हात्रे, श्वेता जाधव यांच्यासह गौरी कदम, चित्रा पाटील, अमित जाधव, राजेश जाधव, दिनेश मोरे, प्रियंका जाधव, शाश्वती कांबळे, दीपक आरोंदकर, नीता आरोंदकर, प्रचिती पाटील, यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.