पुणे: “ ब्रह्मचर्य, सत्कर्म, ईश्वरभक्ती आणि मानवता यांचे ऐक्य हे भारताच्या गीतेने संपूर्ण जगाला दिलेले तत्वज्ञान आहे. या तत्वाज्ञातूनच संपूर्ण जगात शांतता आणि एकता नांदू शकेल. त्यातूनच विश्वकल्याण होईल.” असे विचार थायलंड येथील बोधीसत्व फाउंडेशनचे अध्यक्ष व जगप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू डॉ.बुध्दचरण दास यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत 24 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 24 व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.एस. परशूरामन, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एनस.पठाण, माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू व व्याख्यानमालाचे समन्वयक प्रा.डॉ. मिलिंद पांडे , प्र कुलगुरू प्रा.डी.पी. आपटे व प्रा. डॉ. आर.एम. चिटणीस हे उपस्थित होते.
डॉ.बुध्दचरण दास म्हणाले, “ ध्यानधारणेच्या माध्यमातून आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न करीत रहावे. अहंकाराला मनात थारा देऊ नये. खरे म्हणजे निसर्ग हाच सर्वांचा गुरू आहे. विज्ञान आणि धर्मज्ञान आपल्याला परिपूर्ण ज्ञानाचा मार्ग दाखवितात. वेदांमध्ये सर्व प्रकारचे ज्ञान आहे. आनंद मिळविण्यासाठी कोणताही बाह्य मार्ग नाही, स्वतः आनंदी राहणे हाच एकमेव मार्ग आहे. सप्तसूर हे ज्ञानाचे प्रकटीकरण आहे. ते अनंत समृद्धीचे साधन आहेत. सप्तसुरांच्या माध्यमातून शांती, मनसमृद्धी आणि आंतरिक समाधान याची शिकवण मिळते. आपला आत्मा चेतनेचा महासागर आहे. योग आणि ध्यानधारणा हे मनःशांतीची दिशा दाखवितात. विश्वशांतीसाठी हे विश्वविद्यालय आदर्श कार्य करीत आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले “ आजच्या युगात स्वतःला ओळखण्याची गरज आहे. जेव्हा स्वतःला ओळखाल तेव्हा परिवर्तनाची चाहूल लागेल. या व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश्य हाच आहे की यातून आम्हाला जीवनाचा वेगळा मार्ग सापडेल. त्यातूनच सुख, समाधान आणि शांती मिळेल. त्याच प्रमाणे स्वामी विवेकांनद यांनी सांगितल्यानुसार भारत 21 व्या शतकात विश्वगुरू बनेल. आत त्याच दिशेने आम्ही वाचटाल करीत आहोत.”
डॉ. मिलिंद पांडे यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. ही व्याख्यानमाल गेल्या 24 वर्षापासून सातत्याने होत आहे.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केल. प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले.