पुणे-
बाजार समितीने मार्केट यार्ड सुरू करण्याची भूमिका घेतल्या नंतर रविवारी तरकरी भाजीपाला बाजारात बहुसंख्य डमी विक्रेते होते. डमी विक्रेत्यांनी बहुतांशी शेतीमाल विकला. अडते असोसिएशने बंदची भूमिका घेतल्याने रविवारी डमी विक्रेते बाजारात आणि अडते घरी असल्याचे चित्र पाहवयास मिळाले.सध्या कोरोनासंकट असताना आडत्यानी शेतकऱ्यांना व शासनाला सहकार्य करण्याची गरज असताना अडते मात्र, बाजार बंद करून घरी बसले होते.
ग्राहकांची लूटमार सुरुच –
दरम्यान किरकोळ विक्रेत्यांनी आणि क सोसायटया मधून भाजीपाला विक्रीतुन लॉक डाउन चा फायदा घेत ग्राहकांची प्रचंड लूटमार सुरुच ठेवली असल्याचे चित्र कायम आहे. ग्राहकचळवळ ,कार्यकर्ते, शासन, या स्तरावर याबाबत निव्वळ डोळेझाक होत असल्याचे दिसते आहे.
दरम्यान
बाजार समितीने आवाहन केल्यानंतर बरेच अडते आणि कामगार बाजारात आले. तसेच नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये. नियमित गुळ भुसार, फळे, भाजीपाला विभाग सुरू राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी देशमुख यांनी केले.देशमुख म्हणाले, कामगार, अडते, कामगार यांनी बाजार चालवण्यासाठी सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे. रात्री ९ ते पहाटे ४ वाजेपर्यंत शेतीमाल बाजारात आला. आलेला सर्व शेतीमाल गेट नंबर ४ वरून सर्व गाड्या आत सोडल्या. तसेच साधारणतः १५०० तीन चाकी टेम्पो मधून शेतीमाल शहरात पाठवण्यात आला. बाजारात गर्दी होऊ नये म्हणून बाजार समितीचे सर्व कर्मचारी आणि १२०-१३० पोलिसांचा फौजफाटा होता. त्यामुळे बाजारात आवारात घाऊक खरेदीदारांना ओळखपत्र बघूनच आत सोडले. त्यामुळे इतर कोणालाही बाजारात प्रवेश दिला नाही. तसेच सुरक्षित अंतर ठेऊन सर्व बाजार सुरळीत चालू होता. बाजार समितीच्या उत्तम नियोजनामुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे मार्केट यार्ड नियमित सुरू झाले आहे.