सत्तेचा वापर हुकुमशाही पद्धतीने -शरद पवार
जुन्नर (आनंद कांबळे वार्ताहर )-
सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर करून महाराष्ट्रला 25 वर्ष मागे सारण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. राज्यात शेतीकडे उद्योगधंदे याकडे लक्ष दिले जात नाही,गुन्हेगारीचे प्रमाण बोकाळले आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जुन्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे आधीकृत उमेदवार अतुल बेनके यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत केले.
खासदार अमोल कोल्हे ,आमदार दिलीप वळसे पाटील, तालुकाअध्यक्ष पांडुरग पवार , बाजार समिती सभापती संजय काळे,विघनहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप माजी आमदार पोपटराव गावडे,सुर्यकांत पलांडे, राम कांडगे, प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे,शरद लेंडे,धनराज खोत, उज्जवला शेवाळे, ,नगरपालिका उपनगराध्यक्षा अलका फुलपगर ,गटनेते दिनेश दुबे आदी मान्यवरासह जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य , राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकते ,महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले ,ईडीने माझे नाव गोवले, मी त्या बँकेचा पदाधिकारी नाही,संचालक,नाही का सभासद नाही ,विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभ्रम नको म्हणून मीच त्यांच्या चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला . नोटाबंदीत काही जणांनी काळा पैसा शुद्ध करून घेतला .
नोटाबंदीसारखा इतिहासात घोटाळा आहे. नोटा बंदीत तर अमित शहांच्या बँकेत एकाच दिवसात कोट्यवधी रुपये जमा झाले तर आमच्या शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेच्या नोटा मात्र बदलुन दिल्या नाही . राज्यात 16000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे 70000 कोटींचे कर्ज माफ केले.शेतकरी हिताच्या योजना राज्यकर्त्यांनी बंद केल्या. मोठमोठ्या उद्योजकानीं बँकांचे कर्ज बुडविले त्यांना मोकळे सोडले गेले आहे.शेतकरी विरोधी नेत्यांच्या हातात सध्या सत्ता आली आहे, त्यांना धक्का देण्याची आवाहन पवार यांनी केले.
खासदार अमोल कोल्हे यावेळी बोलताना म्हणाले महाराष्ट्रत परिवर्तनाची व शरद पवार नावाची लाट आली आहे. मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद पडल्या असून बेरोजगारीमुळे तरुण नोकऱ्यांची मागणी करतोय अशी टीका करताना जुन्नर तालुक्याची जागा मोठ्या मताधिकय्याने निवडुन आनण्याचा विश्वास व्यक्त केला..
अतुल बेनके यांनी यावेळी म्हणाले की,तालुक्यातील धरणाचे पाणी तालुक्यातच ठेवणार,यशवंतराव चव्हाण पर्यटन केंद्र उभारणार, चिल्हेवाडीचे पाणी तालुक्याच्या पूर्व भागात नेणार . तालुका पर्यटन घोषित केला पण कोणताही निधी आणला नाही अशी टीका केली.