सामाजिक उत्तरदायित्व जप्त केली जनजागृती
भिवरी ( ता.पुरंदर) : कोरोना वाइरसचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन त्याला नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे मोलमजुरी करणार्या लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न तयार झाला. ही बाब लक्षात घेऊन पुण्यातील सुप्रसिद्ध येवले अमृततुल्यच्या वतीने येवले फाऊंडेशनच्या माध्यमातून आस्करवाडी ( ता. पुरंदर) येथील गरजु , कष्टकरी शेतकरी कुटुंबियांना घरगुती जीवनावश्यक किराणा मालाचे वाटप करत कोरोना वाइरस विषयी गावात जनजागृती करत एक सामाजिक बांधिलकी दाखवली आहे.
कोरोना वाइरस मुळे संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे हातावर पोट भरणारे लोक, शेतकरी, कष्टकरी कामगार यांना रोजगार उपलब्ध नाही. आज लॉकडाऊन होऊन दहा दिवस झाले आहे. ग्रामीण भागात उन्हाळा चालू असल्याने शेतात कामे नाही. त्यामुळे शेतकरी व गोरगरीब मजुर वर्गांना देखील हाताला काम उरले नसून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मुलाबाळांसोबत कुटुंबाचे पोट कसे भरायचे असा प्रश्न पडला असतानाच. येवले फाऊंडेशनने आपली एक संवेदनशील सामाजिक बांधिलकी लक्षात घेत आस्करवाडी येथील गरजु शेतकरी कुटुंबांना गहु, ज्वारी बाजरी तांदुळ, साखर, चहापावडर तुरडाळ, मुगडाळ, कोलगेट, धुण्याचा साबण, कपड्याचा साबण, मसाले आदी जीवनावश्यक किराणा वस्तुचे वाटप केले. यासाठी त्यांनी सात टिमच्या माध्यमातून वस्तुंचा वाटप केले. या उपक्रमामुळे गरजूंना काही दिवस आधार मिळण्यास मदत झाली.
यावेळी येवले अमृततुल्यचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ येवले, आस्करवाडीचे सरपंच परशुराम पायगुडे, माजी सरपंच जालिंदर वाडकर, पोलीस पाटील मनोज पायगुडे, गणेश येवले, निलेश येवले, विजय येवले, शैलेश येवले, दिपक येवले, तेजेस येवले, मंगेश येवले, विश्वास येवले, दत्तात्रेय येवले, पप्पू येवले, अशोक येवले, आदी फाऊडेशनने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.