पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 2 हजार 607 तर दोन हजार 475 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी-एकुण 265 रुग्णांचा मृत्यू
पुणे दि. 20 :- पुणे विभागातील 2 हजार 475 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 हजार 347 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 607 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 4 हजार 525 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 184 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 114 आहे. कोरोनाबाधित एकूण 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 178 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रूग्णाच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये पुणे जिल्हयात 245 ,सोलापूर जिल्हयात 18 ,कोल्हापूर जिल्हयात 53, सांगली जिल्हयात 7 व सातारा जिल्हयात 28 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 166 कोरोना बाधीत रुग्ण असून 76 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 87 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 461 कोरोना बाधीत रुग्ण असून 168 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 261 आहे. कोरोना बाधित एकूण 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 59 कोरोना बाधीत रुग्ण असून 34 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 24 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 136 कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 121 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 60 हजार 90 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 49 हजार 259 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 10 हजार 882 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 43 हजार 812 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 5 हजार 347 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 21 लाख 17 हजार 67 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 5 कोटी 21 लाख 25 हजार 845 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 511 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
वंदे भारत मिशन अंतर्गत विभागामध्ये अत्तापर्यंत परदेशामधून 476 प्रवाश्यांचे आगमन झाले आहे. यापैकी पुणे जिल्हयात 372, सोलापूर जिल्हयात 18 ,कोल्हापूर जिल्हयात 29, सातारा जिल्हयात 22व सांगली जिल्हयात 35 प्रवाशी आले आहेत. विभागातून 5 हजार 876 बसद्वारे 76 हजार 404 प्रवासी बाहेर गेले आहे. तसेच 294 बसद्वारे 5 हजार 832 प्रवासी विभागात आले आहेत, असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले आहे.