मुलीसाठी सुरू झालेली पहिली शाळा आज ही राष्ट्रीय स्मारक होत नाही ही मोठी शोकांतिका- रघुनाथ ढोक
पुणे- सावित्रीमाई ने आपल्या भारत देशात प्रथम सुरू केलेली मुलींची पहिली शाळा राष्ट्रिय स्मारक म्हणून घोषित करून त्या वास्तूचे जतन व्हावे यासाठी फुलेप्रेमींनी आक्रोश व मशाल मोर्चा समता भूमी ,महात्मा फुले वाडा ते भिडे वाडा दि.20 सप्टेंबर 2019 रोजी काढला होता.
याबाबत फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष रघुनाथ ढोक म्हणाले की आपल्या देशात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हजारो वर्षापासून चुल व मुलं या पूर्ती मर्यादित असलेली महिलांनसाठी पहिली शाळा 1 जाने 1848 रोजी या भिडे वाड्यात सुरू केली त्यास आज 171 वर्ष पूर्ण झाले तरी त्या वास्तूचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित होऊन जतन होत नाही ही मोठी शोकांतिका आहे. तसेच या शाळेपुढे एका मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आजूबाजूला असलेली महत्वाची जागा त्याकामी सहज मिळू शकली. सावित्रीमातेमुळे आपण शिकलो शैक्षणिक ,विज्ञानयुगांत उंच भरारी घेतली याची जाणीव न ठेवता हजारोंच्या संख्येने या शाळेपुढे व मंदीरापुढे गणेशोत्सवात गणेश पूजनासाठी पहाटे महिला रस्त्यावर बसतात पण त्याना व सरकार आणि पुरातत्त्व विभागास भारतीय पहिली शाळा पूर्ण मोडकळलेली दिसत नाही हे एक अजबच गोस्ट आहे. या साठी राज्यभरातील हजारो तरुण तरुणी ,संघटना,संस्था गेली अनेक वर्षांपासून अदोलन करीत आहे तरी त्याकडे दुर्लक्ष करून सरकारी यंत्रणा बिल्डर,भाडेकरू कोर्ट याचे कारणे देऊन वेळ काडूपणा करीत आहे. पुढे ढोक असेही म्हणाले की सरकारच्या मनात आले तर एखादी वास्तू ,जागा ताब्यात घेऊन त्या बिडरला त्या जागेतील एफअसआय दुसरीकडे दुप्पट देऊन तसेच भाडेकरुना आजूबाजूला शेजारीच नवीन होणाऱ्या इमारतीत योग्यरित्या गाळे देऊन पूनर्वसन सहज करु शकते एवढे अधिकार असतात. सरकारला ह्या ऐतिहासिक वास्तुचे राष्ट्रीय स्मारक करताना,भाडेकरू, बिल्डर यांचे सोबत तोडगा काडून मार्ग काढणे काहीही अवघड नाही.
या मोर्चात संसद खासदार सौ नवनीत राणा,आमदार रवी राणा सहभागी होऊन फुले शाहू आंबेडकर यांचे नुसते नावं घेऊन उपयोग नाही तर त्यांचे विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे तसेच सावित्रीमाईनी या ठिकाणावरून ज्ञानाची गंगा सुरू केली त्या वास्तूचे राष्ट्रीय स्मारक होंत नाही तोपर्यंत आम्ही अखंड लढा देणार आहोत म्हणूनच खास अमरावती वरून आलेचे सांगितले.
या मोर्चात सावित्रीबाई यांचे वेशभूषेत सहभागी झालेल्या प्रा. राखी रासकर यांनी सद्या जीर्ण अवस्थेत मोडकळीस आलेल्या भिडे वाड्यावर भिडे वाडा बोलला ही कविता सादर करून वास्तवता सांगितली.
या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार कमल नानी ढोले पाटील,दीपक जगताप,आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीचे चे कल्याण जाधव ,अमर हजारे, समन्वयक गोविंद डाके,युवा माळी च्या सुनीता भगत,वृषाली शिंदे तसेच हजारोचे संख्येने फुले प्रेमी व राज्यभरातून विविध संघटनेचे पदाधिकारी या आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.सर्व फुले प्रेमी ची पुणे मनपा कडून अपेक्षा आहे की या जागेत काही गैर प्रकार घडतात, ते या पुढे घडू नये,ह्या ऐतिहासिक वास्तूला सद्या वॉचमन ठेऊन पावित्र्य राखण्याचे काम करावे ही मागणी पण केली.मोर्चा सम्पल्यावर भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई सह 70 कार्यकर्त्यांनी चौकात ठिय्या आंदोलन केले म्हणून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सायंकाळी सोडले .