- भाजीपाल्यासाठी झुंबड आणि लुटालुटही
कोरोना -पुण्यात सुरु सत्वपरीक्षा
पुणे- घरात बसू ,पण खायचे काय ? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या हजारो नागरिकांनी आज मार्केट यार्डात सकाळी झुंबड उडविली . कालपासून इथे व्यापारी चढ्या भावाने विक्री करताना दिसत होते तर आज उडालेल्या कोलाहलात अशा व्यापाऱ्यांची जिरविण्याची संधी काही ग्राहकांनी सोडली नाही त्यांनी हि यात सहभागी होत व्यापाऱ्याच्या धांदलीचा फायदा घेत पैसा न देता भाजीपाला घेऊन काढता पाय घेतला.दुसरीकडे रस्त्यावर पोलिसांनी लाठ्या चालवायला सुरुवात केली आहे . अशा स्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी लोकसयंमासह प्रशासनाचीही सत्वपरीक्षा सुरु झाली आहे. रस्त्यावरील आणि घरातील जीवनातही शांतता कशी नांदेल हे पाहण्याची जबाबदारी आता वरिष्ठ नेते आणि अधिकारी यांना मोठ्या हिकमतीने पार पाडावी लागणार आहे .
पुणे तिथे काही नाही उणे .. इथे कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली रविवारी पुण्यानं घरातच दिवस घालविला ,पण रात्री ९ नंतर हि बंधने आली .पण दुसऱ्या दिवशी सोमवारी मात्र ती अनावर झाली. भाजीपाल्यासाठी लोकांनी मार्केट यार्डात गर्दी केली आणि व्यापार्यांनी चढ्या भावाने लुटालूट केली . ठराविक चांगल्या मालाच्या पिशव्या ठरविकांसाठी राखून ठेवल्या .लोकांनी हे सारे पाहिले .सोसले अन रस्त्यावर मग चौकशी नाही थेट पोलिसाची काठी हि बसू लागली. १४४ कलम लागू असताना , एकट्या ,दुकट्या मोटारसायकल स्वाराला फटके देणारे उत्साही पोलीस प्रथम सोशल मिडिया वर व्हायरल झाले आणि नंतर उशिरा का होईना सटेलाईट चनेल नेहि असा लाठीमार दाखवायला सुरुवात केली .
इथे जनतेच्या आरोग्याची च काळजी असल्याने प्रक्षोभ निर्माण झाला नाही अनेकांनी लोक घरी बसावेत म्हणून त्याचे समर्थन देखील सोशल मिडीयावर केले . पोलिसांची दहशत हवीच आणि आता ती चांगल्या आरोग्यदायी जीवनासाठी कामी येत असेल तर हरकत काय ? म्हणून प्रश्न विचारला गेला .
प्रत्येक गोष्टीला काळ,वेळ याची मर्यादा येते असे म्हणतात . रविवारी जनता कर्फ्यू नंतर सोमवारी पुन्हा कर्फ्यू लागू झाला .अर्थात हा कर्फ्यू म्हणजे काय असेल काय नसेल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होतेच . पण त्याचवेळी पुण्यात पोलिसांनी वाहनबंदीचे फर्मान सोडले. अत्यावश्यक वाहने त्यातून वगळली .अत्यावश्यक कामासाठी जाणे येणे वगळले . दोन्ही आदेश स्पष्ट असताना पाच लोकांनी एकत्र येवू नये ,विनाकारण रस्त्यावर गर्दी करू नये .असे स्पष्ट असताना विना चौकशी पोलीस अगोदर फटके मारताना आणि नंतर चौकशीविना सोडून देताना दिसून आले. तरीही पोलिसांबद्दल लोकांनी कोणताही ओरडा केला नाही . जनारोग्यासाठी हि दहशत असली पाहिजे असेच मत व्यक्त केले गेले .पण घरी बसा ,घरातच बसा असे वारंवार सल्ले मिळत असताना घरातील भाजीपाला संपू लागला . आणि पुढे कधी कुठे भाजीपाला मिळे ल याची शाश्वती पुण्यात कोणाला उरेना .
अशाच सावटाखाली मंगळवार उजाडला आणि लोकांनी पुन्हा सकाळी सकाळी मार्केट यार्डात एकच गर्दी केली . गर्दी एवढी झाली ,झुंबड एवढी उडाली कि मार्केट यार्डात आत शिरायला लोकांना जागा मिळेनासी झाली.कोणतीही वस्तू ५० रुपये आणि १०० रुपयांशिवाय मिळणे दुरापास्त असताना ती घेतली जात होती अक्षरशः पुढे पुढे, मला द्या , मला द्या ,अशा ग्राहकांच्या चहुबाजूने वेढलेल्या ग्राहकांच्या गलक्यात व्यापारी गोंधळून गेले असहाय्य बनले आणि मग अनेकांनी या कोलाहलात आपल्या पिशव्या भरून घेतल्या . एकीकडे व्यापाऱ्याकडून काल पासून होत असलेल्या लुटालूट वृत्तीत आज काही ठिकाणी ग्राहक हि सहभागी झाल्याचे दिसत होते .
बोंबील मार्केट ,मासळी बाजार ३१ मार्च पर्यंत बंद असल्याचे या बाजाराच्या जागेवर जाताच नागरिकांना समजत होते . तर आज भाजीपाला हि पुढे किती दिवसांनी मिळणार याबाबत लोक चिंतेत असल्याचे दिसून आले. त्यातच भर म्हणून वर्तमानपत्रे आज अनेक ठिकाणी वितरीत झाली नाहीत तर उद्यापासून काही वृत्तपत्रे हि अनिश्चित काळासाठी बंद असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.आहे, घरी बसू पण किती दिवस ? घरात बसून खायला कसे मिळणार ? पुढे नेमके होणार काय ? अशा विविध प्रश्नांनी पुणे चिंतेच्या, एका अदृश्य सावटाखाली असल्याचे दिसते आहे.