पुणे-काँग्रेस मध्ये सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांत सामावले असून दंगली घडविणाऱ्या भाजपच्या भूलथापांना बळी नका. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांनाच बहुमताने विजयी करा असे आवाहन तेलंगणाचे काँग्रेस खासदार रेवंथ रेड्डी यांनी केले. घोरपडी गाव येथील बालाजीनगर मध्ये आयोजित महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्या कोपरा सभेत ते बोलत होते.
गेल्या विधानसभा निवडणुकीत वेंकय्या नायडू यांनी येथील तेलगू बांधवाना भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र भाजप आमदारांनी घोरपडी आणि एकूण कॅन्टोन्मेंटसाठी काहीही विकास काम केले नाही. आता मी खासदार रेवंथ रेड्डी छातीठोकपणे सांगतो की, कॅन्टोन्मेंटच्या सर्वांगीण विकासासाठी रमेश बागवे यांनाच मतदान करून विजयी करा, असे आवाहन रेड्डी यांनी करताच हजारो तेलगू बांधव, कार्यकर्ते , यांनी रेड्डी व बागवे यांचा जय जय कार केला.
या प्रसंगी बोलताना रमेश बागवे म्हणाले की या भागातील घोरपडी रेल्वे गेट, ओव्हर ब्रिज, वाहतुकीचा प्रश्न मी सोडवणार आहे. त्यासाठी विक्रमी मतांनी मला विधानसभेत पाठवा.
यावेळी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस किरण रेड्डी , नगरसेवक अविनाश बागवे , हर्षद बोराटे , संजय कवडे , चंद्रकांत कवडे, सुरेखा कवडे, चिन्नया , समीर हाके , बाळा शेट, श्रीनिवास, प्रदिप परदेशी , रामय्या, महाआघाडीचे कार्यकर्ते व तेलगू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.