मुंबई-भाजपने राज्याची वाट लावली आहे. नेते आणि आमदारांना ईडीची भीती दाखवून धमकावले आहे. आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या त्यांच्या हालचाली आहेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होवू देणार नाही, असा इशारा देतानाच जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यांनी खुशाल सरकार बनवावं, असंही असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितलं.
दलवाई यांनी आज सामना कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थेट भाष्य केल्याने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात सत्तेचा पेच निर्माण झालेला असतानाच पहिल्यांदाच काँग्रेसच्या नेत्याने शिवसेना नेत्यांशी चर्चा केल्यानेही काँग्रेस-शिवसेनेचे सूर जुळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आह
भाजपपेक्षा शिवसेना कधीही चांगलीच आहे, हे मी नेहमीच सांगत आलोय. हे माझं आजचं विधान नाही. शिवसेना आणि भाजप हिंदुत्वामुळे एकत्र आले. पण दोन्ही पक्षाच्या हिंदुत्वात जमीन-आस्मानचा फरक आहे, असंही ते म्हणाले. राज्यातील सध्याचं सरकार हे भाजपचं नव्हतं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सरकार होतं. स्वातंत्र्य काळात संघाने ब्रिटीशांना मदत केलीय, अशी टीकाही त्यांनी केली.