डॉ भरत वाटवाणी यांना प्रा. डॉ देवानंद शिंदे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान
पुणे: देशाच्या कानाकोपर्यातील विविध रस्त्यावर फिरणारे लाखो मनोरुग्ण हे आजही उपेक्षित व वंचितच राहिलेले असून त्यांच्या उपचार व पुनर्वसनासाठी शासकीय पातळीवरून मोठ्या प्रमाणात हालचाली होणे आवश्यक असल्याचे मत श्रद्धा पुनर्वसन केंद्राचे संस्थापक व गतवर्षीच्या रँमन मँगसेसे पुरस्काराचे मानकरी व जेष्ठ मनोविकार तज्ञ डॉ भरत वाटवाणी यांनी कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये जीवनगौरव पुरस्कार स्विकारल्यानंतर बोलताना व्यक्त केले.
मनोदय मेंटल हेल्थ फोरम, कर्वे समाज सेवा संस्था पुणेच्या वतीने वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या “जीवनगौरव पुरस्कार वितरण व समुपदेशन अभ्यासक्रम उद्घाटन” सोहळ्याप्रसंगी श्रद्धा पुनर्वसन केंद्राचे संस्थापक, गतवर्षीच्या रँमन मँगसेसे पुरस्काराचे मानकरी व जेष्ठ मनोविकार तज्ञ डॉ भरत वाटवाणी यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे कुलगुरू प्रा.डॉ. देवानंद शिंदे व जेष्ठ मनोविकार तज्ञ डॉ उल्हास लुकतुके यांच्या हस्ते “जीवन गौरव पुरस्कार- २०१९” प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कर्वे समाज सेवा संस्थेचे चेअरमन सदानंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेचे प्र. संचालक डॉ. महेश ठाकूर, मेंटल हेल्थ फोरमचे कार्याध्यक्ष प्रा. चेतन दिवाण तसेच फोरम चे सल्लागार डॉ सुप्रकाश चौधरी व डॉ संजय कुमावत यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये हा सोहळा पार पडला.
श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून आपण आजपर्यंत जवळजवळ आठ हजाराहून जास्त रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांना रस्त्यावरून उचलून त्यांच्यावर उपचार करीत त्यांचे स्वग्रही सोडून पुनर्वसन केले असले तरीही आज हि असे अनेक रुग्ण रस्त्यावर भटकत आहेत त्यांच्यासाठी शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली होऊन त्यांना मदत मिळणे आवश्यक असून देशातील तरुणांनी व विशेषतः समाजकार्याचे शिक्षण घेणार्या तरुणांनी यासंबंधी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मट देखील डॉ भरत वाटवाणी यांनी व्यक्त केले.
डॉ भरत वाटवाणी यांनी सुरु केलेले कार्य हे मानवतावादी दृष्टीकोनातून सुरु केलेले असे उल्लेखनीय कार्य असून समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या या कार्यास हातभार लावावा व समाजामध्ये अशा रुग्णाच्या उपचार व पुनर्वसनासाठी लोकजागृती करण्याचे काम करावे असे आवाहन डॉ उल्हास लुकतुके यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद देशपांडे यांनी जीवन गौरव पुरस्कार्थीं डॉ भरत वाटवाणी जीवनगौरव पुरस्कार देणे हा आमच्या संस्थेचा देखील सन्मान असल्याचे सांगत त्यांनी केलेल्या महान कार्यास समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हातभार लावावा व हे अद्वितीय कार्य असेच अखंडपणे सुरु ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.
डॉ. महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवाण, डॉ सुप्रकाश चौधरी, डॉ. संजय कुमावत यांनी मनोगते व्यक्त करीत जीवन गौरव पुरस्कार्थी व समुपदेशन अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाची सुरुवात दिप्प्रज्वालन व महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
मेंटल हेल्थ फोरमचे कार्याध्यक्ष प्रा. चेतन दिवाण तसेच डॉ शरद अकोले, डॉ प्रवीण पारगावकर, रॉनी जॉर्ज, शर्मिला सईद, मेधा पुजारी, अरुंधती कुलकर्णी, मोतीलाल सोनटक्के, भाग्यश्री दिक्षित, डॉ. जयदीप पाटील, नीलिमा बापट, स्मिता गोडसे,डॉ. अनुराधा पाटील, राहुल शिरुरे आदी मेंटल हेल्थ फोरमच्या सल्लागारांच्यावतीने डॉ भरत वाटवाणी यांचा मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चेतन दिवाण यांनी केले. सूत्रसंचालन शर्मिला सईद यांनी केले. तर आभार स्मिता लोंढे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशाली अद्वैता, नंदा वायगनकर,रुपाली खेडकर, सिमा पोलाया, अपर्णा सांगलीकर, सत्यपाल लोने, क्रांती खैरमोडे, इम्रान सय्यद, जगदीश बोरुडे आदींनी विशेष परिश्रम घेतले