रमेश बागवेंचा रथ रोखण्यासाठी साम ,दाम,दंड भेद नीती वापरूनही भाजप घायकुतीला …
पुणे- गेल्या ३५ वर्षांची राजकीय कारकिर्द ,सद्य स्थितीत साथीला हुशार आणि जनहितवादी विचारसरणीचा युवा पुत्र ,सुरुवातीपासून कायम साथ निभावणाऱ्या कार्यकर्त्यांचा सहभाग ,आणि कायमच बरोबर राहिलेल्या आपल्या मतदार संघातील हितचिंतक नागरिकांची फौज ,या जोरावर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांचा प्रभाव करण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच भाजपने वापरल्याचे या निवडणुकीत दिसून आले आहे. बागवे यांनी गेल्या २०१४ च्या पराभवानंतर तातडीने सुरु केलेल्या २०१९ च्या लढाईच्या तयारीचा रथ …रोखण्यासाठी… निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यानंतर .आणि आता अखेरच्या टप्प्यात हा रथ रोखताना अक्षरशः भाजप घायकुतीला आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. विद्यमान आमदार आणि माजी मंत्री दिलीप कांबळे यांची उमेदवारी कापून त्यांच्या भावाला उमेदवारी देण्यात आली आणि कॉंग्रेस मधील बागवे यांच्याशी स्पर्धा करू पाहणारे संधिसाधू राजकारणी फोडून बागवेंवर मात करता येईल काय या दृष्टीने प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले .
प्रथमतः हे समजायला हवे कि भावाचे तिकीट कापून दुसऱ्या भावाला का दिले ? या मतदार संघात मागासवर्गीय ,मध्यमवर्गीय, गोरगरिबांचे मोठे वास्तव्य आहे.. भाजपच्या दिलीप कांबळे यांना याच मतदार संघातून भाजपने कायम संधी दिली .आणि कॉंग्रेस विरोधी लाटेत त्यांना अशा संधीचा २ वेळा फायदा झाला .आणि इथला बागवेंचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी च (जनहितासाठी नाही )दिलीप कांबळे यांना दोन्ही वेळा मंत्री केले .पण दुदैवाने २ वेळा समाजकल्याण खाते मिळूनही कुठे त्यांच्या समाजाचे कल्याण झाल्याचे दृष्टीक्षेपात आले नाही .उलट दोन्ही वेळेस त्यांच्यावर काही ना काही बालंट आले आणि मंत्रीपद काढून घेण्यात आले.लोहियानगर पासूनचा कांबळे यांचा हा प्रवास सातत्याने अशाच मार्गावर राहिला . लोकांनी आशेने त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांच्याकडून निराशाच पदरी पडली .
औरंगाबाद येथे खुद्द मंत्री असलेल्या कांबळे वर चक्क ‘वाईन्स शाॅप चा परवाना देतो सांगून खंडणी उकळण्याच्या गुन्हा दाखल होणे म्हणजे सरकारच्या दृष्टीने अत्यंत शरमेची बाब होती . ती कशी बशी झाकून ठेवण्याचा प्रयत्न करण्याची वेळ फडणवीस सरकारवर आली .आणि कांबळे यांना अभय देवून लाज राखण्याची वेळ आली .याबाबत आजतागायत सरकार च्या वतीने ,भाजपच्या वतीने कोणीही कसल्याही स्वरूपाचे अधिकृत वक्तव्यदेखील केलेलं नाही .आणि दिलीप यांची उमेदवारी डावलून त्यांच्या भावाला म्हणजे सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली गेली . आता एका भावाची उमेदवारी का कापली आणि दुसऱ्या भावाला का दिली ? याबाबत देखील कसलेही स्पष्टीकरण ना स्थानिक नेत्यांनी केले ,ना सीएम फडणवीस यांनी केले.किमान कांबळे यांनी तरी स्पष्टीकरण करायला हवे होते पण त्यांनी हि केले नाही .
या साऱ्या ..त्यांच्या खामोशीत च … सारे काही स्पष्ट आले असे लोक मानू लागले.
पुणे महापालिकेतील स्थायी समितीवर दर वर्षी वर्णी लावत,आवत नुकतीच समितीच्या अध्यक्ष पदावर देखील त्यांची वर्णी लावलेली असताना . त्यांनांच दिली विधानसभेची उमेदवारी ….. नागरिक ,मतदार ..विरोधक ..सोडा ..पण खुद्द भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील हि बाब रुचली नाही .महापौरांना विधानसभेची उमेदवारी, स्थायी समिती अध्यक्षांना उमेदवारी , एकाच बाजूने सातत्याने होणारा हा वर्षाव पाहून आणि निकष पाहून
निष्ठावंतांचा संताप झाला नाही तर नवल च …. . अशा पद्धतीने पक्ष चालविण्यात येत असल्याबाबत जाहीर रित्या माध्यमांपुढे बोलले गेले. बंडखोरी केली गेली .पण अखेरीस या बंडखोरांनी ..पक्ष शिस्तीचा भाग म्हणून बंडखोरी मागे घेतली .पण या नव्या कांबळे यांच्या प्रचाराला कोणी पुढे धजावेना .. आम्ही काय सांगावे लोकांना ..म्हणत त्यांनी पर्वती मतदार संघात जावून माधुरी मिसाळ यांच्या प्रचाराचे काम पत्करले .स्थायी समितीचा कारभार चार भिंतीच्या आता ‘अभय ‘ रित्या चालविणाऱ्या या उमेदवाराला मदत द्यायला हवी म्हणून त्यासाठी अखेर कॉंग्रेस मधील रमेश बागवे यांच्यावर नाराज असलेली मंडळी फोडून ती या कांबळे यांच्या पाठीशी उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण खरोखर हि मंडळी त्यांच्या पाठीशी आहेत काय ? जी मंडळी कॉंग्रेस कडे याच मतदार संघातून लढण्यास इच्छूक होती तीच मंडळी नेमकी घेण्यात आल्याने उलट कांबळे यांच्या ‘ती ‘ पाठीशी ‘ राहतील कि कांबळे यांनाच घरचा रस्ता दाखवून ..स्वतःचा रस्ता इथे तयार करण्याचा यत्न करतील …ते अर्थात येणारा काळच सांगणार आहे. कारण अशा दलबदलू ची पत्नी पंजाचा तर दल बदलून भाजप मध्ये गेलेला पती कमळाचा प्रचार करताना इथे दिसून आले.
भाजपचे बरेचसे कार्यकर्ते कांबळे यांच्याबरोबर काम करीत नाहीत हे स्पष्ट झाल्यावरच पायाखालची वाळू घसरली आणि मग सुरु झाली साम ,दाम , दंड भेद ,नीती … पुण्यातील ८ पैकी सर्वाधिक हि नीती वापरली कुठे गेली असेल तर या मतदार संघात .. बाग्वेंनी भाजपला फोडलेला घाम ..त्यामागे कारणीभूत आहे .
२०१४ च्या पराभवानंतर रमेश बागवे यांनी कॉंग्रेसचे कार्यकर्ते ,आपले कार्यकर्ते,मतदार यांच्याशी सलग ५ वर्षे संपर्क ठेवला आहे ,सातत्याने लोकहितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत .पक्षातील अन्य विरोधकांकडून त्यांचे पाय खेचण्याच्या स्ठीतीत त्यांनी आपले कामकाज कधी थांबविले नाही . त्यांचे चिरंजीव नगरसेवक अविनाश बागवे यांनी महापालिकेच्या माध्यमातून प्रशासनातील आणि सत्ताधाऱ्यांकडून होणारी गैरप्रकारांची पाठराखण सातत्याने चव्हाट्यावर मांडून मुखवटे ओरबाडून काढण्याचे काम केले आहे . आता त्याच्या पक्षातील अनेक पदे उपभोगलेली बडी कार्यकर्त्यांची फळी भाजपचे मधून काढण्यात यासह मिळविले आहे , एवढेच काय या मतदार संघात बागवे यांच्या प्रचारासाठी बडी नेते मंडळी येणार नाहीत यासाठी देखील हि कुटनीती अवलंबली गेली आहे. मोहन जोशी,विठ्ठल थोरात ,दयानंद अडागळे, राहुल डंबाळे, संगीता तिवारी आणि अविनाश बागवे आणि बागवेंची अन्य मुले, आणि बागवे यांच्याशी इमान ठेवलेली ठराविक कार्यकर्ते मंडळी बागवे यांच्याबरोबर ठाम राहिली आहेत .पण तरीही एकीकडे महापालिका स्थायी समिती चा चेअरमन असलेल्या माजी मंत्र्याचा भाऊ एवढीच पुंजी घेऊन आलेला आणि त्यासाठी काहींनी आक्रमक पणे फोडा फोडी चे तंत्र वापरल्याने आता बागवे यांची राजकीय कारकीर्द पणाला लागणार आहे आणि अखेर त्यांची सारी भिस्त आता केवळ मतदारांवर असल्याचे दिसते आहे.