नाव : श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
जन्म : 7 फेब्रुवारी, 1953
जन्म ठिकाण : जोर्वे, तालुका-संगमनेर, जिल्हा अहमदनगर.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती कांचन.
अपत्ये : एकूण 4 (एक मुलगा व तीन मुली)
व्यवसाय : शेती.
पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय).
मतदारसंघ : 217- संगमनेर, जिल्हा अहमदनगर.
इतर माहिती : विद्यार्थी जीवनात पुणे येथे फर्ग्युसन व विधी महाविद्यालयात असताना पाणी पंचायत चळवळीत सहभाग; 1980 विडी कामगार व शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आंदोलनात सक्रीय सहभाग नऊ दिवस कारावास; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत सक्रीय सहभाग; विश्वस्त, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्था, अमृत वाहिनी शेती व शिक्षण संस्था, संगमनेर : 1980 संस्थापक, अमृत वाहिनी व्यावसायिक सहकारी दूध संस्था; 1980 संचालक व 1988-93 चेअरमन, संगमनेर तालुका दुध उत्पादक सहकारी संघ, घुलेवाडी; संगमनेर तालूक्यात दुध उत्पादन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न, संगमनेर तालुक्याच्या शेक्षणिक विकासात सहभाग, भंडारदरा धरणामध्ये असलेल्या पाण्याचे शेतीसाठी फेरवाटप व्हावे यासाठी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व व फेरवाटप करून घेण्यात यशस्वी, निळवंडे धरणाचे कामे पूर्ण व्हावे यासाठी चळवळ उभी केली; 1989 संचालक व 1993 – 2001 चेअरमन, भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, संगमनेर; 1989 अध्यक्ष, राज्य विडी कामगार किमान वेतन समिती, अहवाल शासनास सादर करून महागाई निर्देशांकाप्रमाणे वेतन वाढीची शिफारस केली; दुष्काळग्रस्तांसाठी मदतकार्य; निळवंडे धरणाचे काम पूर्ण व्हावे यासाठी चळवळ उभी केली; संस्थापक व अध्यक्ष, संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन; 1993-99 संचालक, नॅशनल हेवी इजिनिअरींग सहकारी संस्था. संचालक, ऑल इंडिया डिस्टलरी असोसिएशन नवी दिल्ली; 1998-2000 सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी; उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल 2008 मध्ये देशभक्त किसनवीर सामाजिक संस्थेच्या “समाजकृतज्ञता” पुरस्कार, 2014 मध्ये यशवंत प्रतिष्ठान पुणे यांच्या कडुन “यशवंत-वेणू” पुरस्कार व 2015 मध्ये माधवराव लिमये फाऊंडेशनचा “कार्यक्षम आमदार” पुरस्काराने सन्मानीत; 1985-90, 1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-14, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा.
विधी मंडळाच्या रोजगार हमी, आश्वासन, सार्वजनिक उपक्रम व पंचायत राज समित्यांचे सदस्य म्हणून काम केले; ऑक्टोबर, 1999 ते जुलै, 2004 पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर, 2004 ते ऑक्टोबर, 2009 जलसंधारण आणि खारजमीन खात्याचे मंत्री; नोव्हेंबर, 2009 ते नोव्हेंबर, 2010 कृषी जलसंधारण, रोजगार हमीयोजना आणि शालेय शिक्षण (अतिरिक्त कार्यभार) खात्याचे मंत्री; नोव्हेंबर, 2010 ते सप्टेंबर, 2014 महसूल खार जमिनी खात्याचे मंत्री; राज्यभर शेततळ्यांची निर्मिती, सुवर्ण जयंती राजस्व अभियान सरू केले, खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप; महसूल खात्याचा कारभार ऑनलाईन करण्यात पुढाकार; राज्यातील शेत जमिनीचे नव्याने मोजणी करण्याचा निर्णय घेतला; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.
(संदर्भ: 13 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)