पुणे: इम्बी इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील नामवंत पॉलिमर प्रोसेसिंग कंपनी 11 ते 15 डिसेंबर 2019 या कालावधीत पुण्यातील मोशी येथे होणाऱ्या किसान 2019 या भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनामध्ये अवाना या विशेष बिझनेस युनिटअंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेती क्षेत्रावर आधारित सोल्यूशन सादर करणार आहे. किसान फेअर 2019 मधील अवानाच्या स्टॉलवर अवाना जलसंचय सुपर हे आकाशी रंगाचा लाइन्ड कृत्रिम शेततळे पर्याय मांडला जाणार आहे. या पर्यायाचा वापर करून, 50% कमी बाष्पिभवन होणारे आधुनिक तळे निर्माण करता येऊ शकते आणि हा पर्याय मत्स्यशेतीसाठीही साजेसा आहे.
इम्बी इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मकरंद अप्पलवार यांनी सांगितले, “अवाना सर्वंकष जलसंवर्धन पर्याय निर्माण करते. या पर्यायांचा वापर करून महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक व मध्य प्रदेश येथील दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागांतील शेतकऱ्यांना दारिद्र्य व उपासमार या विळख्यातून बाहेर काढता येऊ शकते. अवाना जलसंचय सुपर पेटंटेड हॅबिटेक तंत्रज्ञान वापरते. हे तंत्रज्ञान बाष्पिभवनामध्ये 50% घट करते आणि तळ्यातील अल्गलमध्ये वाढ करते. यामुळे मासे वाढण्यासाठी मदत होते. आम्ही आर्थिक वर्ष 2021 पर्यंत 2,500 हून अधिक जलसंचय सुपर शेततळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
जलसंचय ब्रँडअंतर्गत कंपनी 13.5 फूट या जगातील सर्वात रूंद पाँड जिओ मेम्ब्रन्सचे उत्पादन करते. यामुळे गळती व त्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय कमी केला जातो. जलसंचय सुपरमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा आणखी एक स्रोत मिळेल आणि भारतातील प्रत्येक शेतकऱ्याची भरभराट करण्याचे आमचे उद्दिष्ट साकार केले जाईल.
अवानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली अप्पलवार यांनी सांगितले, “किसानमध्ये आम्ही केवळ एक नवीन उत्पादन दाखल करत नसून, शेतकऱ्यांना पहिलावहिला रिटेलचा अनुभवही देणार आहोत. स्टॉलवर विविध उपक्रम असणार आहेत आणि त्यातून शेतकऱ्यांचे अवानाबरोबर पाणीबचत करण्याचे उद्दिष्ट अधोरेखित केले जाणार आहे. नागपूर, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पाणीबचतीसाठी उत्तेजन देण्याचा आमचा हेतू असल्याने, लवकर नोंदणी करणाऱ्यांना विशेष सवलती व बक्षीसे दिली जातील.”
इम्बी इंडस्ट्रीजविषयी:
इम्बी इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील एक नामवंत पॉलिमर प्रोसेसिंग कंपनी आहे. इम्बी विस्तृत जागतिक वितरण जाळ्याद्वारे 5 खंडांतील 57 देशांत कार्यरत आहे. कंपनी पुढील क्षेत्रांमध्ये व्यवसाय करत आहे: जलसंवर्धन, स्पेशल्टी पॅकेजिंग, अॅडव्हान्स्ड कम्पोझिट्स व अॅग्रो पॉलिमर्स. उद्योजक मकरंद अप्पलवार व रिंकू अप्पलवार यांनी इम्बी प्रमोट केली आहे आणि कंपनीची स्थापना नोव्हेंबर 1994 मध्ये करण्यात आली. कंपनी बीएसई व एनएसई या देशातील दोन प्रमुख शेअर बाजारांत सूचिबद्ध आहे.
अवानाविषयी:
अवाना हे इम्बी इंडस्ट्रीज लिमिटेडचे बिझनेस युनिट आहे. भारतीय शेतकऱ्यांना दारिद्र्य व उपासमार यांच्या विळख्यातून सोडवण्यासाठी किफायतशीर तंत्रज्ञान निर्माण करणे, हे अवानाचे उद्दिष्ट आहे. जलसंचय व जलसंचय सुपर या ब्रँडद्वारे अवानाने 8000 हून अधिक शेतकऱ्यांच्या मदतीने 35 अब्ज लिटर पाण्याचा साठा केला आहे. हे युनिट मिलेनिअल व जेन झेड कर्मचाऱ्यांच्या मदतीने विशिष्ट उद्देशाने रिटेल ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न करते.