लग्न हे प्रेम, अभिजातता आणि वैपुल्य यांचं साजरीकरण असतं. लग्नाची प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी थीमपासून प्रत्येक गोष्ट हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी महत्त्वाची असते. अर्थात, प्रत्येक लग्नात सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असते, ती सुंदर नववधू. सगळ्यांचे डोळे तिच्यावर आणि तिच्या कालातीत सौंदर्यावर खिळलेले असतात. विशेषतः ती लग्नाचा खास पोशाख आणि दागिन्यांमध्ये लग्नमंडपात अवतरते, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्याचकडे असतात. जर तुम्हीही लवकरच नववधूच्या भूमिकेत शिरणार असाल, जन्मोजन्मीची गाठ बांधण्यासाठी सज्ज होत असाल, तर कल्याण ज्वेलरीच्या ‘मुहूरत’ या लग्नासाठीच्या दागिन्यांच्या श्रेणीतील कोणते दागिने तुमच्याकडे असायला हवेत याची यादी इथे देत आहोत. दागिन्यांची ही श्रेणी लग्नाच्या दिवशी तुमचं सौंदर्य आणखी खुलवेल.
- मांग टिका केशभूषेच्या भांगात घातला जातो आणि त्याला एकप्रकारचा पारंपरिक लूक आहे, जो तुम्हाला जुन्या काळाची आठवण करून देतो. मांग टिका वेगवेगळे प्रकार आणि डिझाइनमध्ये खरेदी करता येतात. तुमचं कपाळ कसं आहे आणि लग्नाच्या दिवशी तुमचा लूक कसा असणार आहे याचा विचार करून तुम्ही मांगटिका निवडा. जर तुमचं कपाळ मोठं असेल, तर भरजरी टिका चांगला दिसेल. जर तुमचं कपाळ थोडं छोटं असेल, तर हलक्या वजनाचा, नाजूक मांग टिका उठून दिसेल. मांग टिका शक्यतो इतर दागिन्यांच्या डिझाइनशी सुसंगत असतो.
नथ ही महाराष्ट्रीय संस्कृतीत स्त्रीच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करणारा दागिना मानला जातो. ही सुंदर नथ तुमच्या संपूर्ण पोशाखाला आणखी झळाळी देईल.
- मंगळसूत्र चंपाकळी हार –चंपाकळी हाराची ही आधुनिक आवृत्ती कोणत्याही महाराष्ट्रीय नववधूसाठी आवश्यक आहे. हा एक नाजूकपणे तयार केलेला चोकर आहे, जो नववधूच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवशी उठून दिसेल. हे नेकलेस पारंपरिक प्रकारच्या फुलांच्या डिझाइनप्रमाणे वेगवेगळे मोतिफ्स आणि रंगीत खड्यांनी बनवण्यात आले आहे.
- बांगड्या:तुमच्या मनगटाची शोभा तसंच एकदंर स्टाइल या बांगड्यांनी आणखी वाढवा. पारंपरिक पण तितक्याच ट्रेंडी असलेल्या या कड्यासारख्या बांगड्या नजाकतीने बनवण्यात आल्या आहेत व नववधूचे सौंदर्य आणखी खुलवणाऱ्या आहेत.
4. राणी हार: नावाप्रमाणेच हा हार राणीचा वाटतो. राणी हार लांब आणि राजेशाही असल्यामुळे इतरांची नजर तुमच्याकडे वळल्याशिवाय राहाणार नाही. नेकलेसच्या तुलनेत राणी हार लांबलचक आणि राजेशाही असल्यामुळे त्यात वेगवेगळे पदर आणि पेंडंट येतात. राणी हार अतिशय ठळक, उठून दिसणारा दागिना आहे आणि कोणत्याही भारतीय वधूने लग्नाच्या दिवशी असा हार परिधान करण्याची संधी सोडता कामा नये.
- ठुशी: प्रत्येक महाराष्ट्रीय वधूला तिच्या दागिन्यांच्या संग्रहात एक छानशी ठुशी हवी असते. ही स्टायलिश आणि सुंदर ठुशी पारंपरिक महाराष्ट्रीय दागिना असून त्यात फुलांचे मेतिफ्स समाविष्ट करण्यात आले आहेत. यातले लाल खडे ठुशीच्या नाजूकपणात आणखी भर घालणारे आहेत.
- मंगळसूत्र:हा सर्वात बंधनकारक दागिना आहे, जो वधू आणि वरातील जन्मोजन्मीचे नाते गुंफणारा असतो. काळे मणी आणि पिवळ्याधमक सोन्यापासून बनवण्यात आलेले हे मंगळसूत्र पाहाताक्षणी प्रेमात पाडणारे आहे.