नवी दिल्ली:
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशाच्या वित्तीय तुटीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची असलेली भारतीय अर्थव्यवस्था वाढत्या वित्तीय तुटीमुळे अत्यंत चिंताजनक स्थितीकडे ढकलली जात आहे, असा इशारा त्यांनी दिला. प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन ब्राउन विद्यापीठातील ओपी जिंदाल व्याख्यानमालेदरम्यान बोलत होते.
गेली अनेक वर्षे अर्थव्यवस्था उत्तम होती
विकासाचे नवीन स्रोत शोधण्यात अपयश
भारतीय अर्थव्यवस्था सुस्तीच्या टप्प्यातून जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाढीचा दर सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहित तो ५.३ टक्क्यांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. समस्या कोठे सुरू झाल्या त्याविषयी बोलताना राजन म्हणाले की यापूर्वीचे प्रश्न सुटलेले नाहीत. खरी समस्या म्हणजे विकासाचे नवीन स्रोत शोधण्यात भारत अपयशी ठरला आहे.
गुंतवणूक, खप आणि निर्यातीत वाढ आवश्यक
राजन म्हणाले, ‘भारतासमोरील आर्थिक संकट एक लक्षण म्हणून पाहिले गेले पाहिजे मूळ कारण म्हणून नव्हे.’ विकास दरातील घसरणीसाठी त्यांनी गुंतवणूक, खप आणि निर्यातीतील सुस्ती तसेच एनबीएफसी क्षेत्रातील संकटाला जबाबदार धरले.
जीएसटी, नोटबंदी जबाबदार
आर्थिक मंदीसाठी नोटबंदी आणि नंतर घाईत लागू केलेला जीएसटी जबाबदार असल्याचे राजन यांनी सांगितले. हे दोन निर्णय झाले नसते तर अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत राहिली असती. सरकारने कोणाच्याही सल्ल्याशिवाय नोटबंदी लागू केली. लोकांचं नोटबंदीमुळे नुकसान झालंच, शिवाय यामुळे फारसं काही हातीही लागलं नाही.