जळगाव- कोरेगाव-भीमा हे प्रकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात घडलेलं होतं. महाविकास आघाडी सरकारकडून त्याची चौकशी सुरू झाल्याने केंद्र सरकार घाबरले आहे. यात केंद्र सरकारला काहीतरी झाकायचे असावे, म्हणूनच त्याचा तपास काही तासात राज्य सरकारकडून काढून घेत ‘एनआयए’कडे साेपवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. जळगावातील पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, केंद्राला त्याचा अधिकार असला तरी राज्य सरकारची परवानगी घेतली नाही. राज्यात मध्यवधी निवडणुकीची चर्चा देखिल निरर्थक असून भाजपच्या नेत्यांचे ज्याेतीष आणखी चार वर्षे खरे ठरणार नसल्याचा दावा पवारांनी केला. महाविकास आघाडीचा मुक्ताईनगर येथील शेतकरी मेळावा व जैन इरिगेशनतर्फे आयाेजित पुरस्कार वितरण साेहळ्याच्या निमीत्ताने राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार दाेन दिवसाच्या जळगाव दाैऱ्यावर आले हाेते. रविवारी सकाळी जैन हिल्स येथे आयाेजीत पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला.