मुंबई-गोळी लागून धारतीर्थ पडलेल्या महात्मा गांधींनी ‘हे राम म्हणत ,यांना क्षमा कर असे म्हटले होते ,आता दुसरे गांधी ज्यांना संबोधले जावू लागले होते त्या अण्णा हजारे यांची मात्र जणू काही आताच सटकली आहे. हैद्राबादमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटरमध्ये खात्मा करण्यात आला. त्यानंतर देशात दोन गट तयार झाले. काहीजण एन्काउंटरच्या बाजूने बोलत होते तर काहीजण त्याच्याविरुद्ध. यातच आता जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “फाशी होत नसेल तर एनकाउंटरच योग्य,” चक्क अशी प्रतिक्रीया आण्णांनी दिली आहे.न्यायालयीन व्यवस्था सुधारणे ऐवजी ते होत नसेल तर त्यांनी एन्काउन्टर च योग्य असे म्हणून अनेकांना धक्का दिला आहे. आण्णांकडून अशी अपेक्षा नव्हती असे म्हणण्या शिवाय अण्णांना मानणाऱ्या ना पर्याय उरला नाही.
आण्णा हजारे म्हणाले की, ”देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या वारंवार घटना घडत आहेत. ते सर्व खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसेल, तर पोलिसांनी केलेले एन्काऊंटर योग्यच आहे. हैदराबादमधील घटनेत आरोपी पोलिसांवर प्रतिहल्ला करून पळून जात होते. त्या परिस्थितीत त्यांचे झालेले एन्काऊंटर योग्य आहे. दिल्लीतही पूर्वी अशीच अत्याचाराची घटना घडली होती. त्यातील आरोपींन अद्याप फाशी झालेली नाही.” असेही आण्णा हजारे म्हणाले. हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी अनेकांकडून संशय व्यक्त केला जात असताना अण्णा हजारे यांनी ही थेट भूमिका घेतली आहे.