पुणे- गेल्या एप्रिल 2021 मध्ये करण्यात आलेल्या लॉकडाउनला विरोध म्हणून हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांनी शांततामय मार्गाने साखळी आंदोलन केले होते. यादरम्यान सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उदभवली नसताना जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांवर खटले दाखल करण्यात आले होते. आता हे खटले विनाविलंब मागे घेतले जातील, असे ठोस आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्चंतेद रांका, सचिव महेंद्र पितळीया यांनी गुरुवारी दिली.दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांची व्यापाऱ्यांनी भेट घेतली होती. यावेळी पुढील कार्यवाही जलद व्हावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून विषय पूर्णत्वास न्यावा असे निर्देशही माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना फडणवीस यांनी दिले.व्यवसाय बंद असल्याने व त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलन केले होते. शांततमाय मार्गाने केलेल्या या आंदोलनात कोणतीही दगडफेक, जाळपोळ, सरकारी मालमत्तेचे नुकसान अशा घटना झाल्या नाही. त्यामुळे आता याप्रकरणी दाखल झालेले खटले मागे घेतले जाणार आहेत.
व्यापाऱ्यांच्या पाठीशी भाजपा -खटले काढून घेणार :फडणवीसांचे आश्वासन
Date: