Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘अच्छे दिन‘ यायला 25 वर्षे लागतील -अमित शहांचे वक्त्यव-(जनतेला बनविले उल्लू … ?)

Date:

भोपाळ – अगोदर जनतेला स्वप्ने दाखवायची आणि नंतर कोलवायचे असाच प्रकार आता भाजपने मतदारांशी केल्याचे वाटू लागले आहे त्याला कारण हि तसेच घडते आहे ‘अच्छे दिन‘ची स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘अच्छे दिन‘ यायला 25 वर्षे लागतील  असे म्हटले आहे.भारताला पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्यासाठी भाजपला या 25 वर्षांमध्ये ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणूक जिंकावी लागणार आहे, असे शहा म्हणाले.

भोपाळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी हे वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीवेळी अच्छे दिन आनेवाले है असे जाहिराती केल्या होत्या. देशातील नागरिकांनी भाजपला भरभरून मतदान करत सत्तेत आणले होते. आता अमित शहा यांनी अच्छे दिनसाठी 25 वर्षांची वाट पहायला लागणार असल्याचे म्हटले आहे.
शहा म्हणाले, इंग्रज राजवटीच्या आधीचा काळ देशाच्या वाट्याला पुन्हा आणणे. हेच खरं अच्छे दिनाचे आश्वासन होते. येत्या पाच वर्षात अर्थ, परराष्ट्र, सुरक्षा, रोजगार यांच्या धोरणात योग्य बदल भाजप घडवेल. मात्र, जगात भारताला सर्वश्रेष्ठ बनवायचे असेल. देशाचे अच्छे दिन आणायचे असतील. तर त्यासाठी 25 वर्ष हवीत. शिवाय त्याचसोबत पंचायत ते संसदेपर्यंत भाजपची भरभराट व्हायला हवी.‘‘
 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पूर्व पुण्यात शरद पवार,उद्धव ठाकरेंसह खा.अमोल कोल्हेंना अजितदादांचा झटका

शहर अध्यक्षांच्या एककल्ली पणाचा शरद पवार गटाला दणका...