‘मज आवडते ही मनापासुनि शाळा लाविते लळा माऊली बाळा’ कवितेच्या या ओळीआळवतच आमची पिढी शिकली.
हो, अगदी बहुसंख्येने मराठी माध्यमातच शिकली. स्वप्नउराशी होतीच पण आमच्या मराठी माध्यमातल्या शाळांनी आम्हाला दिली ती, माणूसहोण्याची शिकवण, सजग होऊन उत्तम नागरिक म्हणून स्वत:ला घडवण्याची एक ताकद आणित्याहूनही जास्त जबाबदारीची जाणीव!!!
या मूल्यांच्या बांधणीवर उभं राहत; पालकत्वाच्या दिशेने आम्ही प्रवासाला लागल्यावरपालकत्व सहज मिळत असलं तरी पालकत्वाची जबाबदारी तितकीशी सहज नसते, याचीजाणीव मनात ठेवत या पालकत्वाच्या एका टप्प्यावर खूप जबाबदारीने घ्यावी लागली तीपाल्याच्या शिक्षणाच्या माध्यम निवडीची धुरा!!!पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात शिक्षणाचे निरनिराळे पर्याय उपलब्ध असताना आणि इतरगोष्टींचा विचार करून मुलीसाठी निवडली ती मराठी माध्यमाची शाळा. हो घरापासून जवळअसणारी, विविध उपक्रमांमध्ये सातत्याने आघाडीवर असणारी आणि मुलांशी प्रेमाने संवादसाधण्यात यशस्वी ठरलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची न्या. रानडे बालक मंदिर ही पूर्व-प्राथमिक शाळा.घराच्या अगदी जवळ, खूप लवकर आणि खूप उशिरा नसणारी (शाळेची वेळ सकाळी १० ते१) शाळा मी मुद्दाम निवडली. या वयातल्या मुलांवर लवकर उठण्याचं बंधन नसावं, हा विचारयामागे होताच.उपक्रमशीलता हा आजच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. आणि या वयातील मुलांसाठी तर तीअत्यावश्यक अशी गोष्ट आहे. पूर्व-प्राथमिकच्या मुलांना गुंतवून ठेवणं आणि त्यांना खेळायला,त्यातून शिकायला प्रोत्साहन देणं, ही मोठी जोखीम असते आणि ती हसतहसत घेतली जाते, याशाळेत. अडीच ते पाच वर्षे वयाच्या मुलांचा कारक कौशल्य विकसित करण्याचे हे वय. यावयात नुसता शारीरिक नाही, तर भावनिक विकास होणेही खूप अगत्याचे असते, त्यावयातल्या या सगळ्या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून शारीरिक – भावनिक – मानसिक विकाससाधण्यासाठी शाळेमध्ये मुक्तव्यवसाय, विषयानुरूप वर्गमांडणी, मातीकाम,हस्तव्यवसाय असविविध उपक्रम राबवले जातात. अर्थात या सगळ्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतअसतात त्या भाषा. मराठी, संस्कृत, इंग्लिश आणि हिंदी या चार भाषांचा समतोल साधतभाषा शिक्षणाकडे जितके लक्ष पुरवले जाते, ते कौतुकास पात्र ठरणारेच आहे.संस्कृत ही शब्दोच्चार सुस्पष्ट करणारी रसवाणी, श्लोक पठणातून मुलांचे उच्चार स्पष्ट करणारीआणि मुलांना एक वेगळा आत्मविश्वास देणारी भाषा, तर मराठी ही आपली रोजच्यावापरातील भाषा. आजकाल जागतिक भाषेचा ताण घेऊन मुलांना इंग्लिश माध्यमात घातलंजातं, पण या भाषेचा ताण न घेता जर आपण मुलांना शाळेतच या गोष्टी केल्या तर याविचाराने छोटा गट आणि मोठा गट या वर्गांसाठी सुरू झालेलास्पोकन इंग्लिश ही भाषाशिकवण्याचा उपक्रमही स्तुत्य वाटतो आहे. तेच हिंदी या आपल्या राजभाषेबाबतही आहे.मुलांची कारक कौशल्य विकसित होणे जितके महत्त्वाचे तितकेच आपण या व्यवस्थेचा भागआहोत आणि आपल्याला आपल्या सांस्कृतिक-सामाजिक धारणा आहेत हे त्यांच्या लक्षात येणंहीतितकंच महत्त्वाचं!! म्हणूनच शाळेत होणाऱ्या स्कृतिक उपक्रमांमध्ये येणाऱ्या सगळ्यासणांचं माहितीपूर्ण संयोजन अधिक महत्त्वपूर्ण आहे. कोणताही मनुष्य संदर्भहीन जगत नाही,त्याला तसं जगताही येत नाही. आपल्याला जर आपल्या मुलांना एका छान सामाजिक जगअनुभवायलायचं सेल तर आपण त्यांना आपल्या आपलं सांस्कृतिक जगही फार जवळूनअनुभवायला द्यायला हवं तर आपली मुलं सामाजिक सलोखा आणि सौहार्द जपू शकणारआहेत. आणि हे असं सामाजिक सलोखा आणि सौहार्द जपण्याचे काम या उपक्रमांतून न्या.रानडे बालक मंदिर या शाळेत जाणिवपूर्वक जपलं जात आहे. त्याचे संस्कार या वयात झाले तर त्याचा परिणाम खोलवर होणारा आहे आणि अर्थातच तो सकारात्मक असणार आहे.स्नेहसंमेलन हाही मुलांबरोबर पालकांच्या आनंदाचा भाग असतो. आपल्या मुलांनी स्टेजवरदिसावं, अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. त्या अपेक्षेचा, पालकांच्या मागणीचा विचारकरून स्नेहसंमेलनात जास्तीत जास्त मुलांचा सहभाग घेतला जातो. तीन ते पाच या वयोगटातील मुलांना नाचाचा सराव त्यांच्या मनाप्रमाणे देणं, किती जिकीरीचं असतं, हे सरावघेणारे शिक्षकच सांगतील. पण कोणतीही तक्रार न करता, सातत्यपूर्ण सराव आणि त्याजोरावर केलेलं यशस्वी स्नेहसंमेलन ही या शाळेची आणखी एक जमेची बाजू आहे. इतकंच नाहीतर ज्या मुलांना स्नेहसंमेलनात सहभागी होता येत नाही, त्यांना १८ जानेवारी रोजी न्या.रानडे यांच्या स्मरणार्थ घेतल्या जाणाऱ्या क्रीडा महोत्सवात आवर्जून सहभागी करून घेतलंजातं. स्पर्धा हा आजच्या जगाचा परवलीचा शब्द आहे. पण स्पर्धेतून येणारी ईर्षा वाईटच याची जाणअसणारे शाळा व्यवस्थापन नेहमीच अनेक स्पर्धांचे आयोजन करते, स्पर्धा जिंकलेल्या मुलांवरअन्याय होणार नाही याची काळजी घेत, पण न जिंकलेल्या मुलांनाही आपण काहीतरी साध्यकेलेलं आहे, या भावनेने शाळा मुलांना काहीतरी खाऊ देऊन सगळ्या सहभागी विद्यार्थ्यांचंकौतुक करते, हे फार महत्त्वाचं आहे. श्लोक पाठांतर स्पर्धा, चित्र रंगवा स्पर्धा, गोष्ट सांगणेस्पर्धा, स्तोत्र पाठांतर स्पर्धा, आंतरशालेय कथाकथन स्पर्धा, सामान्य ज्ञानावर आधारितप्रश्नमंजूषा स्पर्धा या आणि अशा अनेक स्पर्धा मुलांसाठी आयोजित करत असतानाच,महिलादिनानिमित्त महिला पालकांसाठीही पाककला स्पर्धेचे आयोजन आवर्जून केले जाते.उत्साही पालक यात आवर्जून सहभागीही होतात. शिक्षकांचा आंतरशालेय स्पर्धांमधला सहभागआणि त्या सहभागाचे पुरस्काररूपी मिळालेले फळ हे अर्थातच त्यांच्या कामाला, मेहनतीलामिळालेली पावती असते, ही पावती अनेक आंतरशालेय शालेय स्पर्धांमध्ये शाळेतल्याशिक्षकांना मिळाली आहे. नृत्य, गाणं यांसाठी या वयातल्या मुलांना वेगळे, ट्रेन्ड शिक्षक आणित्यांनी या वयातील मुलांची गाण्याची आणि नाचाची वाढवलेली समजही पालक म्हणूनसमाधान देणारी आहे. मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट कोणती असेल? तर ती अर्थात, ‘पालकसभेतमुख्याध्यापक आणि त्यांच्याशिक्षकांनी केलेली एक बहुमोल विनंती.’ हो या शाळेत पालकांनाविनंती केली जाते. ऑर्डर, आदेश दिला जात नाही.
“आम्ही मुलांना पहिलं अक्षर आणि शब्दांचंवाचन शिकवणार आहोत. आम्ही ज्या पद्धतीने घेतो, त्याच पद्धतीने तुम्ही घरी घ्या. पणत्याहीपेक्षा आम्हाला असं वाटतं, की तुम्ही घरी अभ्यास घेऊच नका. शाळेत मुलांना तयार करून घेण्याची जबाबदारी आमची आहे. शिकवण्याची तुमची पद्धत निराळी आणि आमचीनिराळी असते. यातून मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून हा पर्याय आम्ही शोधलाआहे. आणि ज्यांना तरी घरी अभ्यास घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी खास त्याच पालकसभेतफळ्यावर मुलांनी अक्षरं कोणत्या पद्धतीने गिरवायची आहेत, यासाठी प्रात्यक्षिकं दाखवण्यातआली.” स्वत:च्या कार्यक्षमतेवर अतीव विश्वास असल्याशिवाय अशा गोष्टी शाळेच्या पालकसभेत सांगितल्या जात नाहीत. आणि ही वाक्यच आपल्या शिक्षणव्यवस्थेला वेगळेपणदेणारी आहेत. त्याच वेळी आपल्या शिक्षकांना दिली जाणारी दुषणं टाळणारी आहेत. अर्थातपालकसभेत केलेली ही विनंती मी तरी पाळली आणि मला अर्थात याचा चांगला परिणाममाझ्या मुलीच्या बाबतीत दिसला, तो म्हणजे, ‘एक दिवस अचानक छोट्या गटात शिकणाऱ्यामाझ्या मुलीने न अडखळता अक्षरं वाचून दाखवली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. आणिपुढील काहीच दिवसात ती काना-मात्रा नसणारे शब्द वाचू लागली. इतकंच नाही तर त्यानंतरती स्वत:च ते शब्द शाळा किंवा
घरात गिरवून न घेताही लिहू लागली. येता-जाता रस्त्यातथांबून ‘आई, हे बघ इथे ‘मसळ’ असं लिहिलं आहे. तिथे मिसळ लिहिलं होतं.’ पालक म्हणून मीकाहीही कष्ट न घेता शाळेत झालेला हा वाचनसंस्कार मला फार आवडला आणि तो मुलांच्याविकासाच्या दृष्टीने अधिक मोलाचा आहे. एकीकडे शिक्षणशास्त्राने आणि शिक्षणतज्ज्ञांनी सांगितलेल्या तत्त्वांचं काटेकोर पालन करून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारी हीशाळा अनेक नवे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी घेतेच, पण त्याच वेळी शिक्षण व्यवस्थेतील मूलभूतघटक असणाऱ्या पालक आणि शिक्षकांसाठी घेते हेही तितकेच अर्थपूर्ण आहे. सुलेखन कार्यशाळाही त्यातलीच एक उत्तम कार्यशाळा. पालकांचं अक्षर चांगलं असेल तर मुलांमध्ये तो गुण रुजेलया जाणिवेतून शाळेत पालकांसाठी सुलेखन कार्यशाळा घेतली जाते, तर पालक आणि मूल यांच्यातलं नातं जितकं सुदृढ असेल तितकी मुलाची वाढ चांगली होणार आहे, याच भावनेतूनपालक आणि बालक यांच्यासाठी एकत्रितपणे बालक-पालक कार्यशाळा घेतली जाते. मुलांशीशाळेत कसं वागावं, त्यांच्याशी शिक्षकांचा मुलांशी संवाद कसा असावा याची जाणवाढवण्यासाठीही खास शिक्षकांच्या कार्यशाळाही वेळोवेळी घेतल्या जातात.शाळेला असलेली बाग हे शाळेचे अजून एक आकर्षण आहे. मनसोक्त खेळायला मिळणं, हामुलांच्या दृष्टीने अधिक आनंदाचा भाग असतो. शाळेच्या रंगवलेल्या भिंतीवर आपल्यासारखीचमुलं दिसतायत, वर्गातल्या भिंतीपण छान रंगवलेल्या आहेत, त्या मुलांना बघायला आणि त्याभिंतीवर रंगवलेल्या मुलांशी बोलायला आपल्या मुलांना आवडतंय हे चित्रही बघायला खूपचछान दिसतं. तसेच शाळेत दाखवल्या जाणार्या विविध विषयांवरच्या सीडीज हेही मुलांसाठीमोठे आकर्षण असते. अनेक घडामोडी शाळेत घडत असतात, त्यातून मुलांचा या घडामोडींकडेबघण्याचा एक दृष्टिकोन तयार होत असतो आणि त्यातून ती घडतही असतात. त्यादृष्टीनेहीमला पालक म्हणून ही शाळा खूप भावली. या सगळ्या सोयी असूनही कोणत्याही प्रकारचीदेणगी न स्वीकारता
खेळगट – ९०००/-
मिनी केजी – ९५००/-
छोटा गट – १०,५००/-
मोठा गट – ११,५००/-
एवढ्याच रकमेत भरल्या जाणाऱ्या फीमध्ये मुलांना सगळ्याच सणांना खाऊ दिला जातो.मुलांची चव डेव्हलेप करण्यासाठी त्यांना निरनिराळ्या पौष्टिक खाऊंची मेजवानी जशी दिलीजाते, तशीच उसाचा रस, आईसक्रिमही दिलं जातं. मातीत खेळू देणं हाही एक मुलांच्याआवडीचा खेळ मनसोक्त करू दिला जातो. स्नेहसंमेलनात घालावयाच्या कपड्यांचे पैसे वगळताइतर कोणत्याही गोष्टीसाठी पालकांकडून पैसे घेतले जात नाहीत. (हे कपडे अर्थात मुलांसाठी शिवून घेतले जातात आणि स्नेहसंमलेनानंतर मुलांनाच दिले जातात.) अगदी मुलांना सहलीलानेले जाते, तेही याच फीच्या पैशातून.मुलांना मुक्त शिक्षण दिलं, पाहिजे हे सगळेचजण सांगत असतात, पण या शाळेत ती कृती केलीजाते. शनिवारी मोठ्या गटाच्या मुलांना बिनभिंतींची शाळा हा उपक्रम असतो. आणि याउपक्रमांतर्गत मुलांना शाळेच्या आसपासच्या परिसरात क्षेत्रभेटी दिल्या जातात. आपल्याशाळेबाहेरही एक जग आहे आणि या जगात आपण जायला,वावरायला हवं हा संस्कार अगदीनेमकेपणाने या उपक्रमातून मुलांपर्यत पोहोचवला जातो.पाळणाघराची सोय हे या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य आहे. मुलं तिथेच शाळेतून सुटली की,पाळणाघरासाठी खालच्या हॉलमध्ये येतात, ते सुरक्षेच्या दृष्टीने फारच महत्त्वाचे वाटते.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रवेशप्रक्रिया सुरू होते आणि आपल्या शंका-समाधानांनाशांतपणे उत्तर देत, आपल्याला आश्वस्त करते. आपलं मुलं इथे छान बहरेल याची खात्री याशाळेला दिलेल्या पहिल्या भेटीतच होते. स्वच्छ, मोकळा परिसर आणि मुलांना वावरायलापूर्ण मुभा ही शाळेची मुख्य जमेची बाजू आहे. आपलं मूल सुरक्षित, स्वच्छ आणि मनमोकळंराहावं, हीच अपेक्षा या वयातल्या मुलांच्या पालकांची असते. आणि पालकांची ही अपेक्षापूर्णही होते.शाळांमध्ये वैविध्यपूर्ण उपक्रम चालत असतात, त्यातूनच आपलं मुलं, आपण आणि मुलांना ]योग्य दिशा मिळत असतात आणि त्यातूनच एक समाजमन तयार होत असतं. आपल्या मुलांनाफक्त शाळेतला मनमोकळा संवाद हवा असतो. तो मनमोकळा संवाद नक्कीच येथे मिळतो.
– डॉ. अर्चना कुडतरकर
पालक – न्या. रानडे बालक मंदिर, पुणे