दलितांच्या समवेत जेवणाची नौटंकी करण्याऐवजी राहुल गांधीनी दलित मुलीशी विवाह करावा-रामदास आठवले
अकोला- ‘मी ब्राम्हण मुलीशी विवाह केला, राहुल गांधीनी दलित मुलीशी विवाह करावा, दलित समाजात आता त्यांच्या योग्य मुली आहेत; दलितांच्या घरात जाऊन जेवण करण्याची नौटंकी बंद करावी,’ असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी लगावला. ते आज अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.
रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य झाल्यास माझ्या पेक्षा वरिष्ठ नेता म्हणून मला त्यांचे नेतुत्त्व मान्य आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात आपण काम करण्यास तयार आहोत. एक्यानतर बहुमतचे निर्णय मला मान्य आहे. अल्पमत असणाऱ्यानी बहुमत असलेल्याना पाठिंबा द्यावा, बहुमताने निर्णय घेतल्यास ऐक्य टिकेल, एक्याची आज गरज आहेबाबासाहेबांना अपेक्षित सत्तेचे राजकारण प्रकाश आंबेडकरांनी अकोला जिल्ह्यात यशस्वी करुन दाखवले, मात्र राज्यभरात ते जमले नसल्याचे ते म्हणाले.