मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या काश्मीरवरील ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले. देशाने यावर आनंदोत्सव साजरा करावा असे ठाकरे म्हणाले. सोबतच, शिवसेना आणि भाजप सरकारने निवडणुकीत जनतेला कलम 370 हटवण्याचे आश्वासन दिले होते. तेच आश्वासन आज पूर्ण होत आहे असेही शिवसेना पक्ष प्रमुख म्हणाले आहेत.
पोलादी नेतृत्व आजही आहे हे मोदींनी दाखवले
उद्धव ठाकरेंनी या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे तोंडभर कौतुक केले. गेल्या अनेक वर्षांपासून कलम 370 आणि काश्मीरवर कुण-कुण सुरू होती. परंतु, काही गोष्टी वेळेवरच उघड करायच्या असतात. मोदींनी पोलादी नेतृत्व देशात आजही आहे हे सिद्ध करून दाखवले. आता दुसऱ्या देशांना यात नाक खुपसायची गरज नाही असेही उद्धव यांनी ठणकावले आहे.