मुंबई -उद्योगव्यवस्थेत भांडवल अडकविण्या ऐवजी पोलिस आणि न्यायव्यवस्था सबळ करण्यासाठी मोठी तरतूद करुन सरकारने महत्वपूर्ण धोरण अंगिकारणे गरजेचे आहे तरच देशाला अच्छे दिन येतील असे प्रसिद्ध साहित्यिक आणि स्वर्ण भारत पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणी यांनी मुम्बई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मृणाल ढोले पाटिल ,व् राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य लोकनाथ राव उपस्थित होते .
सरकारचे काम उद्योग व्यापार करने हे नाही तर संरक्षण आणि कायदा सुव्यवस्था समर्थ ठेवणे हे आहे देशातील कायदा व्यवस्थेची धुळधाण उडालेली आहे पोलिस व् न्यायाधीश यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढबुन त्यांच्यासाठी भरघोस आर्थिक तरतूद करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले
यासाठी आवश्यक असलेला आर्थिक निधी सरकारी उद्योग व्यवसायतील उपक्रम विकून अथवा त्यांचे ब्यवस्थापन खाजगी संस्थांकड़े सोपवावे .पोलिसांसाठी सध्या 74 हजार कोटी एवढाच निधी दिला जातो तो किमान दुप्पट करण्याची गरज आहे.न्यायसंस्थेसाठी बजेट मध्ये सध्याच्या तरतुदीच्या किमान 10 पट निधीची गरज आहे तरच नागरिकांना सुरक्षितता,गुन्हेगारीवर नियंत्रण व वेगवान न्यायव्यवस्था अनुभवायला मिळेल .जर एका माहिन्यात यातील महत्वपूर्ण मागण्या मान्य केल्या नाहीत तर 2 ऑक्टोबर पासून राष्ट्रव्यापी आंदोलन केले जाईल असे पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.