पुणे- मोदी लाट नसताना लोकसभेसाठी भाजपला मिळालेले अभूतपूर्व यश पाहता विधानसभेला हि तसेच यश मिळेल असे बाहेर बोला ,पण भ्रमात राहू नका अशी भूमिका खुद्द महाराष्ट्राचे भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असल्याचे सांगितले जाते.दरम्यान पुण्यातील हडपसर चे आमदार योगेश टिळेकर , शिवाजीनगर चे विजय काळे यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत .हडपसर शिवसेनेला सोडायचा आणि शिवाजीनगरला संजय काकडे यांना उमेदवारी द्यायची असा प्रवाह असला तरी शिवाजी नगरवर शिवसेनेने हक्क सांगत तेथून पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे ना उमेदवारी देण्यास उत्सुकता दाखविल्याचे वृत्त आहे. दरम्यान औरंगाबादेत गुन्हा दाखल झालेले राज्यमंत्री असलेले कॅंटोमेंट मतदार संघाचे दिलीप कांबळे,आणि पर्वती मतदार संघाच्या माधुरी मिसाळ आणि खडकवासला येथील भीमराव तापकीर यांच्या जागेवर नवे चेहरे देता येतील काय ? याबाबत चाचपणी केली जाते आहे.
गिरीश बापट खासदार झाल्याने कसबा मतदार संघ आता महापौर मुक्ता टिळकांनी लढवावा अशी निश्चिती झाल्याचा दावा हि होतो आहे . शिवसेनेला बरोबर घ्यायचे असल्याने त्यांना हडपसर मतदार संघ द्यायचे तूर्तास निश्चित मानले जाते . पण शिवसेनेची मागणी 3 मतदार संघ तरी सोडावेत अशी आहे. शिवाजी नगर ला विजय काळे यांच्या ऐवजी राज्यसभे वर असलेले संजय काकडे यांना उमेदवारी देवून ,पुढे सत्ता आल्यावर त्यांना पालकमंत्री पद देवून पुण्याचा कारभार त्यांच्याकडे सोपविता येईल काय ? याबाबत हि फडणवीस चाचपणी करत असल्याचे बोलले जाते .पण तत्पूर्वी पुण्यातील आठ हि मतदार संघाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात येईल असे बोलले जात असताना शिवसेनेने शिवाजीनगर मतदार संघावर दावा करत पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांना येथून उमेदवारी देण्यासाठी इच्छया व्यक्त केल्याचे वृत्त आहे. कसबा येथील उमेदवार टिळक यांना दिली तरी तेथून शिवसेनेचा इच्छुक बंडखोरी करू शकेल असे दिसते आहे. पर्वती मतदार संघातून माधुरी मिसाळ यांनी बरीच वर्षे आमदारकी भूषविली कॉंग्रेसचे आबा बागुल येथून आमदारकीची स्वप्ने उराशी बाळगून आहेत . बागुल रिंगणात उतरल्यास मिसाळ यांचीच मते त्यांना मिळणार आहेत .असे असले तरी बागुलांना नितीन कदम आणि सुभाष जगताप या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सहाय्य मिळणार नाही हे स्पष्ट आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पर्वती मतदार संघातून महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचा विचार होऊ शकतो अशी स्थिती आहे. पर्वतीतून शिवसेनेचे बाळा ओसवाल हि तगडे उमेदवार मानले जात आहेत .खडकवासला मतदार संघात भिमराव तापकीर यांना आता थांबवावे असाही मत प्रवाह आहे. नव्या चेहऱ्यांना संधी द्या ,तेच तेच चेहरे आणून भाजपची कॉंग्रेस करू नका असे म्हटले जाते आहे तर दुसरीकडे शिवसेनेला नेमके हडपसर आणि त्या व्यतरिक्त आणखी कोणते मतदार संघ द्यायचे याबाबत भाजपमध्ये विचार मंथन होताना दिसते आहे.