पुणे-कॉंग्रेसकडे उमेदवार नाहीत असे नाही, उमेदवार आहेत ,पण ते तुल्यबळ आहेत कि नाही हा मुद्दा वेगळा .पण उमेदवार असताना ,शिवाय बाहेरून ही एक पैलवान रेडी असल्याची वृत्ते येत असताना कॉंग्रेसच्या उमेदवाराचे नाव यायला उशीर होणे हे कोडे अजून कोणाला उलगडलेले नाही . अशोक चव्हाण ,पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारखे नेते पत्रकारांना म्हणताहेत कि अध्यक्षांना विचार ,आता पुण्यातील उमेदवारांनी थेट राहुल गांधींना फोन करायचा असाच त्याचा अर्थ होतो .त्यांच्या वक्तव्याचे सोडा ,पण विलंबाचा अर्थ मात्र जो तो आपापल्या परीने लावू लागला आहे . काही म्हनताहेत यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नाही ,काही म्हणताहेत यांना उमेदवार आयात करावे लागतात ,अजित पवार तर पूर्वीच म्हटलेच होते यांच्याकडे उमेदवार नसल्यानेआणि इथे राष्ट्रवादी प्रबळ झाल्याने हि जागा राष्ट्रवादी लढवेल … कित्येक बातम्यावर बातम्या ..कोणी म्हणाले हर्षवर्धन पाटील,वंदना चव्हाण ,कोणी म्हणाले शरद पवार ..संजय काकडे यांच्या घरवापसी नंतर कॉंग्रेस चा उमेदवार कोण यावर बरीच चर्चा आणि उत्सुकता दिसून आली . प्रवीण गायकवाड यांचे नाव २ माध्यमांनी लावून धरले आणि त्यांनी ते माघारी हि घेतले .अरविंद शिंदे यांच्या नावाचा काळ मोठा गाजावाजा झाला . मोहन जोशी, अभय छाजेड हि मंडळी कधीपासून उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत .एवढेच काय तत्पूर्वी बाळासाहेब शिवरकर ,अनंत गाडगीळ, उल्हास पवार अशा इच्छुकांची नावे प्रदेशच्या पातळीवरच कापली गेली . निवडणूक लढवायला पैका लागतो ..हे त्रिवार सत्य आहे, अर्थात आम्ही चहा पाजू शकत नाही पण निवडणूक लढवायची आहे असे उमेदवार याच पुण्यात अधून मधून कुठे तरी दिसतात .या पार्श्वभूमीवर गेली कित्येक वर्षे आमदार ,५ वर्षे मंत्री राहिलेले गिरीश बापट यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे . शिवाय आता त्यांना त्यांचे एकेकाळचे पक्षातील स्पर्धक संजय काकडे यांचे पाठबळ लाभणार आहे .साम ,दाम ,दंड ,भेद ..आणि मोदी नावाचा जयघोष , फडणवीसांची चतुराई अशी ताकद घेवून बापात रणांगणात आले आहेत .आणि त्यांना सुद्धा आपल्या रिंगणातील स्पर्धकाची प्रतीक्षा आहे . तोवर त्यांचा प्रचार सुरूच आहे.पण नजर मात्र कॉंग्रेसचा कोण येतोय याकडेच आहेत . कधी नव्हे, म्हणजे कित्येक वर्षानंतर कॉंग्रेसच्या उमेदवाराबाबत निर्माण झालेली उत्सुकता ..आता कॉंग्रेस खरोखर किती तुल्यबळ उमेदवार देईल .. यावरच आणखी रोमहर्षक ठरणार आहे. भाजपकडून बापट म्हटले कि कॉंग्रेस मराठा ,बहुजन उमेदवार देईल अशी सर्वांची धारणा आहे .आणि लढत अशीच होईल असेही सर्वांना वाटते आहे. अर्थात तगडा उमेदवार कधीही रिंगणात बोलवा तो सदैव तयार असतो, उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत देखील असा उमेदवार कॉंग्रेस देवू शकते .तोवर कोण कोण माघारीच्या तयारीने अर्ज भरून ठेवतय ..हीही गम्मत असतेच .. पुणेरी बापटांना फाईट द्यायला कोण येतंय याकडेच सर्वांचे तूर्त तरी लक्ष लागून आहे . खरे तर उमेदवार ठरलेला असताना हि उत्सुकता ताणून ठेवण्यामागे नेमका कोणाचा काय फंडा आहे ..ते कळल्याशिवाय देखील राहणार नाहीच पण त्यासाठी थोडी प्रतीक्षा माध्यमांना करावी लागणार आहे हे नक्की .